कोरोंना विशेष

हुश्श…धारुरकराना दिलासा. सर्व अहवाल निगेटिव्ह

किल्लेधारूर दि.३(वार्ताहर) शहरातील ४० जनांचे स्वॕब आज सकाळी लातुर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते ते सर्व निगेटिव्ह आले असुन यामुळे धारुरकरांनी सुटकेचा निश्वास टाकला. जिल्ह्यातून आज ६६ स्वॕब पाठवण्यात आले होते.

दि.२८ रोजी शहरात औरंगाबादहून आलेल्या तरुणाचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आला होता. यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या धारुरच्या कुटूंबियातील ४० जनांचा स्वॕब नमुने आज लातुर येथील प्रयोगशाळेत सकाळी सहा वाजता पाठवण्यात आले होते. कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आल्याने गेल्या सहा दिवसांपासून शहराला कन्टोनमेंट झोन जाहिर करुन संचारबंदी लावण्यात आली होती. नागरिकांत याबाबतीत दहशत होती. आत्ताच आलेल्या अहवालातून हे सर्व ४० जन निगेटिव्ह आल्याचे जाहिर करण्यात आले. यामुळे धारुरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या अहवालामुळे संचारबंदीतुन मुक्त होण्याची वाट मोकळी झाली आहे. याबाबत रात्रीतून जिल्हाधिकाऱ्यांकडून नवीन आदेश निघण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!