दहावी व बारावीच्या परीक्षा मे व जूनमध्ये; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा.

मुंबई दि.12 एप्रिल – राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कडून 10 वी (SSC) आणि 12 वी (HSC) च्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. राज्य सरकारच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही. तसेच इतर बोर्डांनाही परीक्षा पुढे ढकलण्यास सांगण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितले आहे.
(10th and 12th exams in May and June; Education Minister Varsha Gaikwad’s announcement.)
दरम्यान दहावीची परीक्षा जून मध्ये तर बारावीची परीक्षा मे महिन्यात होईल. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता बोर्डाच्या परीक्षेविषयी काही पालकांत व विद्यार्थ्यांत अस्वस्थता आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. असे वर्षा गायकवाड यांनी म्हटलं. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तसेच एमपीएससी परीक्षा देखील काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असून खबरदारी म्हणून राज्य शासनाकडून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग पसरला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्यामध्ये व्हिसीच्या माध्यमातून बैठक झाली, या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत चर्चा करण्यात आली. दहावी (SSC) आणि बारावीची (HSC) परीक्षा ऐन मोक्यावर आली असताना राज्यात कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. म्हणून मे महिन्याच्या अखेरी दहावी आणि जून महिन्यात बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.