बारावीच्या परीक्षा रद्द; मोदी सरकारचा मोठा निर्णय.

नवी दिल्ली दि.1 जून – केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्या (CBSE) बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. देशातील वाढत्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता केंद्रानं हा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाला (Supreme court) केंद्र सरकारनं दोन दिवसात निर्णय घेऊ असं म्हटलं होत. त्याप्रमाणं बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
( 12th standard examination canceled; Big decision of Modi government.)
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची अचानक प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करत असल्याचं जाहीर केलं. बारावीच्या निकालासाठी कार्यपद्धती लवकरचं जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा आमचं पहिलं प्राधान्य आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.
बारावीचा निकाल कसा लागणार?
बारावीच्या विद्यार्थ्याचा निकाल जाहीर करण्यासाठी वस्तूनिष्ठ कार्यपद्धती जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांच हित लक्षात घेऊन सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द (12th exam) करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांचं आरोग्य याचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं मोदी म्हणाले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात संभ्रम होता तो या निर्णयामुळं दूर कऱण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी सक्ती केली जाणार नाही, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयात परीक्षा रद्द करण्यासाठी याचिका
देशातील कोरोना रुग्णसंख्या पार्श्वभूमीवर अॅड. ममता शर्मा यांनी बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या याचिकेवर हस्तक्षेप याचिका देखील दाखल झालेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालय (Supreme court) या संदर्भात गुरुवारी म्हणजे 3 जून रोजी अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने निर्णय जाहीर करण्यासाठी 2 दिवसांचा वेळ मागून घेतला होता. त्यापूर्वीचं मोदी सरकारनं सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा (12th exam) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्षा गायकवाड यांनी केलं स्वागत.
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केंद्र शासनाच्या या निर्णयाचं स्वागत केलं. राज्यासह देशात आलेल्या कोरोना संसर्गात विद्यार्थ्यांंच्या सुरक्षेसाठीच राज्यानेही दहावीच्या परीक्षा रद्दचा निर्णय घेतला आहे. आज केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचे वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी स्वागत केले.