महाराष्ट्राचा देशात डंका; सांगलीची भावना यादव देशात पहिली. UPSC

मुंबई दि.17 जानेवारी – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant) पदाच्या परिक्षेत महाराष्ट्राची भावना यादव (Bhavna Yadav) हिने देशात मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तिच्या या कामगिरीने महाराष्ट्राची (Maharashtra) शान वाढवली आहे. महाराष्ट्रातून मुलीमध्ये उत्तीर्ण झालेली ती एकमेव महिला अधिकारी आहे.
(Maharashtra’s Danka in the country; The feeling of Sangli was first felt in Yadav country. UPSC)
भावना यादव मूळची सांगली (Sangli) जिल्ह्यातील विटा जवळील नागेवाडी या गावची रहिवासी आहे. तिच्या या यशाचे गावकऱ्यांकडून देखील कौतुक होत आहे. या परिक्षेसाठी नियोजन खूप गरजेचे असते, ते नियोजन मी केले होते. तसेच फिजीकल फिटनेसवर (Physical fitness) देखील ध्यान द्यावे लागते असे मत भावना यादव हिने माध्यमाशी बोलताना व्यक्त केले.
या यशाचा मला खूप आनंद झाला आहे. मुलींनी आव्हाने स्विकारून या फिल्डमध्ये यावे असे आवाहन देखील यावेळी भावना यादवने केले. भावनाचे शिक्षण एम एस्सीपर्यंत झाले. यानंतर तिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. राज्य लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाची परीक्षा भावना दोन वेळा उत्तीर्ण झाली.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची (Central Armed Police Force) परीक्षा ती एक वेळा उत्तीर्ण झाली. परंतू शारीरिक चाचणीत तिला अपयश येत होते. तिने जिद्द आणि चिकाटी न सोडता फिजिकल फिटनेसवर जोर दिला. भावना आता लवकरच हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहे.
हे यश मिळाल्यामुळे मला खूप छान वाटत आहे. मला वाटत नव्हते की मी मुलींमध्ये देशात पहिली येईल असे यावेळी भावना यादव हिने सांगितले. मी यासाठी योग्य ते नियोजन केले होते. तसेच मुलांसोबत रनिंगचा सराव केला होता. पण आधीपासूनच माईंडसेट केला होता असेही तिने यावेळी सांगितले. माझे वडील मुंबई पोलीसमध्ये असल्यामुळे मला पहिल्यापासूनच युनिफॉम सर्व्हिसची क्रेझ होती. माझ्या वडिलाकडून मला प्रेरणा मिळाली असल्याचेही यावेळी तिने सांगितले.
माझे सगळे शिक्षण मुंबईत झाले. मात्र, आम्ही गावासोबत कायम कनेक्ट होतो. यात्रेवेळी आम्ही गावी येत होतो असेही तिने सांगितले. मला हे यश मिळाल्यापासून खूप मुलींचे फोन येत आहेत. आम्हालाही या क्षेत्रात करियर करायचे आहे अशा प्रतिक्रिया मुंलीकडून येत आहेत.
मुलींनी आणि मुलांनीसुद्धा या क्षेत्रात यायला हवे. आपली जर कष्ट करण्याची तयारी असेल तर यश मिळते असेही यावेळी तिने सांगितले. मला हे यश मिळाल्यापासून माझे आयुष्य 360 डिग्रीमध्ये बदलले असल्याचे यावेळी भावना यादवने सांगितले. भावनाच्या या यशामुळे महाराष्ट्राचा देशात डंका पहायला मिळत आहे.