धरणाच्या पाण्यात 9 जणांना जलसमाधी; महाराष्ट्रातील या जिल्ह्यात शोककळा…

पुणे दि.20 मे – पुणे जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या धरणात आज पोहण्याचा आनंद घेणाऱ्या 9 जणांना जलसमाधी मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत चार विद्यार्थ्यांसह पाच महिलां दगावल्या आहेत. या घटनेमुळे पुणे शहर व जिल्हा हादरून गेला असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात गुंडाळवाडी गावात चासकमान धरण आहे. या धरणात गुंजाळवाडी गावातील तिवळी हिल येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलचे चार विद्यार्थी पोहण्यासाठी उतरले होते. मात्र या चौघांचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. निवासी असलेल्या या विद्यार्थ्यांना उद्या पासून सुट्या लागणार होत्या. त्यामुळे शाळेतील 34 विद्यार्थी शिक्षकांसह पोहण्यासाठी चासकमान धरणाच्या जलाशयात गेले होते. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे.
सर्व विद्यार्थी धरणाच्या पाण्यात उभे असताना एका मोठ्या लाटेत सहा ते सात विद्यार्थी पाण्यात ओढले गेले. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. काही विद्यार्थ्यांना पाण्याच्या बाहेर काढण्यात यश आले. मात्र चार विद्यार्थी पाण्यात बुडाले. तनिषा देसाई, रीतीन डीडी, परिक्षित अग्रवाल आणि नव्या भोसले अशी बुडालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दुसरी घटना भाटघर धरणात घडली. पुण्याजवळील भाटघर धरणात पाच विवाहित महिलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू गुरुवारी झाल्याची घटना आहे. सायंकाळीच्या वेळी ही घटना घडली आहे. धरणाच्या जलाशयात पाच ते सहा महिला बुडाल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली होती. स्थानिक नागरिकांनी यातील तीन महिलांचे मृतदेह बाहेर काढले होते. त्यातील एका मुलीला सुदैवाने वाचवण्यात यश आले आहे.
घटनास्थळी दाखल झालेल्या प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील आणि राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या सह्याद्री सर्च अँड रेसकोर्स जवानांनी शोधकार्य सुरू केले. याघटनेत खुशबू लंकेश राजपूत, मनीषा लखन रजपुत, चांदनी शक्ती राजपूत, पुनम संदीप राजपूत आणि मोनिका रोहित चव्हाण अशी बुडालेल्या महिलांची नावे आहेत. सुदैवाने एका मुलीला वाचवण्यात यश आले.
(9 drowned in dam water; Mourning in this district of Maharashtra … )