अनोखी श्रध्दांजली… सलग 11 तास 92 गाणी गावून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली .

इस्लामपूर दि.21 फेब्रुवारी – भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांनी अजरामर केलेली गाणी आणि त्यांचा भारावून टाकणारा जीवनप्रवास यांच्या सादरीकरणाने मंगेशकर यांना अनोखी श्रद्धांजली ( Unique tribute ) वाहण्यात आली. विशेष म्हणजे गायिका ज्ञानेश्वरी देशपांडे-पाटील यांनी सहयोगी कलाकारांसोबत सलग 92 गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
( Unique tribute … Tribute to Lata Mangeshkar by singing 92 songs for 11 hours in a row. )
इस्लामपूरसारख्या निमशहरी भागात सलग 11 तासांचे गायन आणि 92 गाण्यांचे सादरीकरण करण्याचा हा उपक्रम संपूर्ण देशातील पहिलाच आणि अनोखा उपक्रम असल्याच्या भावना सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या. ज्ञानेश्वरी देशपांडे-पाटील यांच्या ‘श्याम-संध्या सांस्कृतिक मंच’तर्फे हा कार्यक्रम लोकनेते राजारामबापू पाटील नाट्यगृहात पार पडला.
‘भारताची गानकोकिळा’ असा सन्मान मिळवलेल्या भारतरत्न लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) यांच्या निधनानंतर देशभरात विविध पद्धतीने श्रद्धांजली वाहिली गेली. त्याचाच एक अनोखा प्रयोग इस्लामपुरात ( Islampur ) झाला. लतादिदींच्या एकूणच 92 वर्षांच्या जीवनकाळाला समर्पित श्रद्धांजली म्हणून प्रत्येक वर्षासाठी एक अशा एकूण 92 गाण्यांचे सादरीकरण झाले. मी होणार सुपरस्टार फेम शुभम सातपुते व विनल देशमुख तसेच डॉ. राहुल नाकील, सूर्यकांत शिंदे, मयुरी जाधव यांनी गायनसाथ केली. निशांत गोंधळी यांनी आपल्या बहारदार निवेदनातून लतादीदींचा जीवनप्रवास उलगडला.
ज्ञानेश्वरी देशपांडे-पाटील या गेली वीस वर्षे संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध व्यासपीठांवरून त्यांनी गाण्यांचे देशभरात अनेक राज्यांच्या सांस्कृतिक व्यासपीठावर सादरीकरण केले आहे. त्यांना त्यांच्या या योगदानाबद्दल कलेचे शिलेदार, द प्राइड ऑफ महाराष्ट्र नवदुर्गा, नाशिकचा राज्यस्तरीय कलारत्न गौरव पुरस्कार तसेच बेळगाव येथील कलारत्न प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, गीता पाटील, ऍड. प्रीतम सांभारे, डॉ. जितेंद्र लादे यांनी कलाकारांचा सत्कार केला. यावेळी बोलताना शामराव पाटील म्हणाले, “श्यामसंध्या मंचकडून राबवलेला देशात हा पहिलाच आणि अभिनव उपक्रम आहे. त्यांचे धाडस कौतुकास्पद आहे. 92 गाणी त्यांनी लीलया सादर केली, यात त्यांचे कौतुक आहे.”
दिलीप पाटील म्हणाले, “ज्ञानेश्वरी पाटील यांनी या उपक्रमाने राज्यस्तरावर सांगली जिल्ह्याचा लौकिक वाढवला आहे. लतादीदी जगभराच्या गानसम्राज्ञी होत्या, ज्ञानेश्वरीना जिल्ह्याची गानसम्राज्ञी म्हणता येईल. त्यांनी देशभर कला सादर केली आहे, यापुढे ही कला सातासमुद्रापार नेण्याची संधी त्यांना मिळावी.” यावेळी एन. टी. घट्टे, विश्वासराव पाटील, डॉ प्रवीण पोरवाल, प्रांत संपत खिलारी, प्राचार्य राजेंद्र कुरळपकर, प्रसाद पाटील, खंडेराव जाधव, अरुण कांबळे, उमेश कुरळपकर, डॉ. राहुल गौर उपस्थित होते.
या कार्यक्रमात ए मालिक तेरे बंदे हम, झिलमील सितारो का, तुम्ही मेरे मंदिर, जो वादा किया वो, तेरा मेरा प्यार अमर, लुटे कोई मन का नगर, दिल विल प्यार व्यार, सावन का महिना, बनाके क्यू बिगाडा रे, कितना प्यारा वादा-2.14 एक अंतरा, लग जा गले, कोरा कागज था, तुने ओ रंगीले, सून बेलिया, आजा रे मै तो, जाने क्यू लोग, आते जाते, तू जहाँ जहाँ, सौ साल पेहेले, बाहो मे चले आवो, भिगी भिगी, छोटीसी उमर मे, मेघा रे मेघा, जिंदगी प्यार का, आके ‘तेरी बाहोमे, अब तो है तुमसे,
बादल यु गर्जता है, मेरे घर आई, मेहेबूब मेरे, सत्यम शिवम, छोड दे सारी दुनिया, गाता रहे मेरा दिल, दुष्मन ना करे, तुझे जीवन की डोर से, मै का करू राम, ये रात भिगी भिगी, वादा न तोड, जाने कैसे कब कहा, चलो सजना, मेंहेदी लगा के रखना, कुछ ना कहो, देखा एक खाँब तो, बिंदीया चमकेगी, जिस्का मुझे था इंतजार, सोला बरस की, अब के सजन, वादा कर ले सजना, कबुतर जा जा, तेरे चेहरे से, ओ मेरे दिल के चैन, परदेसिया, दिल तो है दिल, अबके सजन सावन मे,ये समा, तेरी बिंदीया रे, अजिब दासता है, कांची रे कांची रे, दिल दिवाना, दिन सारा गुजारा, यारा सिली सिली, दिल मै तुझे बीठा के, सलामे इश्क, मेरे खाँबो मे जो आये, हमको हमिसे चुरालो, होटो मे ऐसी बात, एक प्यार का नगमा, रुक जा रात ठहर जा रे, तेरे बिना जिंदगी से, मेरे नसिब मै, शोखियो मे घोला, पिया तोसे नैना, दिल तो पागल है, सून साहिब, तू मेरे सामने, रहे ना रहे हम, ये गलिया, अरेरे रे ये क्या हुआ, ए दिल ए नादान, अपने प्यार के, तुझसे नाराज नहीं जिंदगी, गुम है किसिके, हसता हुआ नूरानी, तुझे देखा तो ये, तुमको पिया दिल दिया, डफलीवाले, अपलम चपलम, जब हम जवा होंगे, नाम गुम जायेगा, परबत के इस पार, जब भी जी चाहे, तेरे मेरे मिलन की, ये मेरे वतन के लोगो ही गाणी सादर झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी 92 वे ये मेरे वेतन के लोगो हे गाणे सुरू असताना रसिकांनी उभे राहून टाळ्या वाजवत साथ दिली. वातावरण भावपूर्ण बनले असताना शिगाव येथील शहिद जवान रोमित चव्हाण यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. शेवटी ज्ञानेश्वरी यांना अश्रू अनावर झाले. श्याम-संध्या सांस्कृतिक मंचच्या लता मंगेशकर यांना श्रद्धांजली कार्यक्रमात सलग 11 तास 92 गाणी गाणाऱ्या ज्ञानेश्वरी पाटील, शुभम सातपुते, विनल देशमुख, डॉ. राहुल नाकील, सूर्यकांत शिंदे, निशांत गोंधळी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.