Aurangabad Osmanabad औरंगाबाद व उस्मानाबाद नामांतराच्या आक्षेप हरकती व सुचनांबाबत मोठी अपडेट.

औरंगाबाद दि.26 एप्रिल – औरंगाबाद व उस्मानाबाद नामांतराच्या (Aurangabad Osmanabad) आक्षेप हरकती व सुचनांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) निर्देशानंतर विभागीय आयुक्तालयात नामांतर विषयात आलेल्या आक्षेप हरकती व सुचनांची छाननी अंतिम टप्प्यात आली आहे.
( Big update regarding Aurangabad and Osmanabad name change objections and suggestions. )
मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नुकताच एक आदेश काढून नामांतर बाबत अंतिम निकाल येईपर्यंत औरंगाबाद व उस्मानाबाद असाच उल्लेख करण्याचे निर्देश दिले आहेत. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar) आणि उस्मानाबादचे धाराशिव (Dharashiv) असे नामांतर राज्य व केंद्र सरकारने केले आहे. केंद्राच्या मंजुरीनंतर राज्याच्या महसुल विभागाने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar) आणि उस्मानाबादचे धाराशिव (Dharashiv) असे नामांतर करण्याबाबत आक्षेप, हरकती व सूचना मागविल्या होत्या.
विभागीय आयुक्तालयात एकुण 7 लाख 4 हजार 656 हरकती, आक्षेप व सुचना दाखल झालेल्या आहेत. यात टपालाद्वारे 2 लाख 69 हजार 241, ईमेलद्वारे 4 हजार 364 आक्षेप व हरकती दाखल झालेल्या आहेत. या आक्षेप व हरकतीची छाननी करण्यासाठी प्रशासनाने 50 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सदर सुचनांच्या छाननीचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे सुत्रांकडून कळते. आलेल्या हरकती व सुचनांत मोठ्या प्रमाणात झेरॉक्स प्रति असल्याचे निदर्शनास आले असून अशा झेरॉक्स प्रति बाजुला काढण्यात येत आहेत. लवकरच हा सर्व डाटा संगणकीकृत करुन राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.