राजकीय

kisan sabha branch किसान सभेच्या शाखेचे जोरदार उदघाटन

68 / 100
परळी / प्रतिनिधी
kisan sabha branch पीक विमा प्रश्नासह शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या किसान सभेचे गुरुवार दि 15 रोजी वांगी(बु)या गावात गाव शाखेचे उदघाटन संपन्न झाले. या प्रसंगी गावात  पाहुण्यांचे स्वागत शेकडो शेतकऱ्यांनी केले.
महाराष्ट्र राज्य किसान सभा मागील अनेकवर्षांपासून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नावर गल्ली ते दिल्ली लढा देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी होत आहे. किसान सभा आपले प्रश्न सोडवू शकते असा विश्वास जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आता निर्माण होत आहे. हमीभाव, विमा प्रश्न, अतिवृष्टी अनुदान या शेतकरी आणि शेती प्रश्नांवर रस्त्यावरील लढाई, कायदेशीर लढाई सर्वच पद्धतीने लढा देत शेतकऱ्यांना कष्टाचे मोल मिळवुन देणाऱ्या किसान सभेबद्दल शेतकऱ्यांमध्ये आस्था निर्माण होत आहे.
गुरुवार दि 15 रोजी परळी तालुक्यातील सीमेवर असलेल्या -वांगी(बु) या ठिकाणी  शेतकऱ्यांनी एकत्र येत किसान सभेची गाव शाखा स्थापन केली.या प्रसंगी किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे, कॉ. दत्ता काका डाके, कॉ. बालाजी कडबाने यांचे शेकडो शेतकरी आणि गावकऱ्यांनी ढोल, हलकीच्या गजरात मिरवणूक काढून स्वागत केले. या गाव शाखा उद्घाटन प्रसंगी कॉ. गजानन जाधव,कॉ. पांडुरंग जाधव,कॉ. अर्जुन जाधव,कॉ. अंकुश ढेबरे, कॉ.सतीश गरड,कॉ.विशाल गरड,कॉ.भास्कर गरड,कॉ.नारायण ढेबरे,कॉ.आबाजी मोहिते,कॉ.मारोती नरके,कॉ.योगेश जाधव यांच्यासह शेकडो तरुण शेतकरी, गावकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!