धारुरचा आणखी एक बळी…. कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या १५

किल्लेधारूर दि.२७(वार्ताहर) तालुक्यातील तांदळवाडी येथील कोरोनाग्रस्त व्यक्तीचे अंबाजोगाई येथे उपचार सुरु असताना निधन झाल्याची माहिती मिळाली. जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना (Corona) बळीत धारुरचा हा पंधरावा बळी (Death) ठरला आहे.
जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. धारुर (Dharur) शहर व तालुक्यातही कोरोना (Corona) पॉझिटीव्ह रुग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक आहे. तालुक्यातील तांदळवाडी येथील एक ७३ वर्षीय वृध्द दि.२५ रोजी अंबाजोगाई येथे कोरोना पॉझिटीव्ह आल्याने उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांना जिभेचा कँसर असताना कोरोनाची (Corona) लागण झाली. त्यांच्या वर दोन दिवस अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र आज दि.२७ रोजी पहाटे त्यांचे निधन झाले. धारुर (Dharur) तालुक्यातून कोविड-१९ (Covid-19) लागण होवून मृत (Death) पावणारे ते १५ वे ठरले. तालुक्यात आजपर्यंत ४८८ जनांना कोविड-१९ (Covid-19) ची लागण झाल्याची नोंद असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी सांगितले.