धारूर तालूक्यातील १५ ग्रामपंचायती कोरोना मुक्त

किल्लेधारूर दि.२९ (वार्ताहर) तालूक्यात कोरोना संसर्ग ग्रामिण भागात फोफावत आहे. एकुण ५५ ग्रामपंचायती पैकी ४० ग्रामपंचायतीत कोरोना (Corona) रुग्ण आढळून आली आहेत. आजही ग्रामस्थ व आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे तालुक्यातील १५ ग्रामपंचायती कोरोना पासून मुक्त राहील्या आहेत. या गावात आज हि दक्षता घेतली जात असून ज्या गावात कोरोना रुग्ण सापडले तेथे ही आरोग्य विभाग कोरोनाचा (Corona) प्रादूर्भाव रोकण्यासाठी पुर्ण काळजी घेत आहे. गावाला कोरोना मुक्त ठेवलेल्या या गावाचे कौतूक आरोग्य प्रशासनाकडून होत आहे.

सर्वत्र कोरोनाचा (Corona) प्रादूर्भाव वाढत आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढला आहे. तालूक्यात आता पर्यंत ४९६ कोरोना पाॕजीटीव्ह रुग्ण सापडली आहेत. ४१५ बरे झाले आहेत ६३ रुग्ण उपचार घेत आहेत तर आता पर्यंत १५ जनांचा मृत्यू कोरोना (Corona) मुळे झालेला आहे. या तालूक्याचा पॉझिटीव्हीटी रेट ७.७ आहे तर मृत्यू दर ३.० टक्के आहे. हा मृत्यूदर जास्त असल्याने आरोग्य विभागात जनजागृती करुन जनतेतील भिती दुर करण्याचा प्रयत्न करत आहे. तालुक्यात एकुण ७३ महसुली गावांसाठी ५५ ग्रामपंचायती आहेत. यापैकी १५ ग्रामपंचायती कोरोना मुक्त राहील्या असून ४० ग्रामपंचायत मध्ये कोरोना (Corona) रुग्ण सापडलेली आहेत. कोरोना (Corona) मुक्त राहीलेल्या ग्रामपंचायत मध्ये आमला, हिंगणी खुर्द, मोरफळी व्हरकटवाडी, कोयाळ, शिंगणवाडी, सुरनरवाडी, चिखली, देवठाणा, कान्नापूर, खोडस, आवरगाव, गांजपूर, चारदरी, आरणवाडी या ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत आरोग्य विभाग व पंचायत समिती यांचे नियोजना मुळे व वेळो वेळी घेतलेल्या दक्षते मुळे हि गावे कोरोना (Corona) मुक्त ठेवण्यात यश आले आहे. कोरोना (Corona) पाॕजीटीव्ह रुग्ण सापडलेल्या गावात हि दक्षता घेतली जात असून नागरीकाना सुरक्षिते बद्दल आरोग्य कर्मचारी अंगणवाडी ताई, आशा सेविका, ग्रामसेवक व शिक्षक मेहनत घेत आहेत. तालूक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोकण्यासाठी पुर्ण खबरदारी घेतली जात असल्याची माहिती तालूका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!