प्रा.ईश्वर मुंडे यांची अखेर माघार….

किल्लेधारूर दि.१७(वार्ताहर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे NCP तालुकाध्यक्ष प्रा. इश्वर मुंडे Ishwar Munde यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी Aurangabad graduates constituency election दि.११ बुधवार रोजी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला NCP बंडाळीचा धोका अशी चर्चा होत असताना आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. पक्ष हितासाठी आपण अर्ज मागे घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून Aurangabad graduates constituency election पदवीधरांच्या प्रश्नांसाठी व मराठवाड्यातील विकास प्रश्न सोडविण्यासाठी निवडणूक लढविण्याची इच्छा दर्शवत राष्ट्रवादीचे धारुर तालुकाध्यक्ष प्रा. इश्वर मुंडे Ishwar Munde यांनी अर्ज भरला होता. मात्र आज दि.१७ मंगळवार माघार घेण्याच्या अंतिम दिनी प्रा. मुंडे यांनी अखेर माघार घेतली. यावेळी बोलताना प्रा.मुंडे यांनी पक्ष श्रेष्ठींच्या आवाहनाला प्रतिसाद देत पक्ष हितासाठी माघार घेत असल्याची प्रतिक्रिया दिली. यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसचा NCP कार्यकर्ता म्हणूनच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde, आ. प्रकाशदादा सोळंके Prakash Solanke यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!