लॉकडाऊनचे काऊंटडाऊन…. दिड शहाण्यांना इशारा

राज्यात पुन्हा लॉकडाऊन Lockdown लावण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती सध्या पहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे Udhav Thakre, उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar, आरोग्य मंत्री राजेश टोपे Rajesh Tope व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ Chagan Bhujbal यांनी कोरोनाचे corona नियम पायदळी तुडवणाऱ्या दिड शहाण्या लोकांना निर्वानीचा इशारा दिला आहे. कोरोनाला corona थोतांड म्हणत बेजबाबदारपणे वागणे, गर्दी करणे, मास्क न वापरणे असे कृत्य करणाऱ्या लोकांवर निशाणा साधण्यात आला असुन येणारी दुसरी लाट ही त्सुनामी असणार की काय? असा संभाव्य धोका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे Udhav Thakre यांनी व्यक्त केला.

बेजबाबदार लोकांमुळे पुन्हा लॉकडाऊन Lockdown  लागणार की काय असा प्रश्न सद्यस्थितीमुळे निर्माण झाला आहे. अनेक जन कोरोनाला काल्पनिक ठरवून मेडियासह अनेकांना दोष देत असतात. सध्या राज्यात गोवा, दिल्ली, गुजरात व राजस्थान येथून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. तर काही दिवसात मुंबईत लोकलसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला जावू शकतो. राज्यातील काही जिल्ह्यात ९ वी ते १२ वी वर्ग सुरु करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशना पाठोपाठ राज्याचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यासर्व घडामोडी पाहता राज्यात पुन्हा लॉकडाऊन Lockdown चे काऊंटडाऊन सुरु झाले असल्याचे दिसत आहे. वेळीच लोकांनी सावरण्याची गरज असुन ज्येष्ठ नागरीक व पुर्व व्याधी असणाऱ्यानी अधिक काळजी बाळगावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!