आज भारत बंद.. बंदबाबत अजितदादांनी घेतली ही भुमिका

मुंबईः दि.८- सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या भारत बंदला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajitdada Pawar) यांनी पाठिंबा दिला असून बंद यशस्वी करण्याचं आवाहन केलं आहे.
7/12 वाचवायचा असेल तर 8/12 महत्त्वाचा आहे. तसेच जात-पात, धर्म, प्रांत हे न पाहता सर्वांनी भारत बंदमध्ये सहभागी होऊन भारत बंदला यशस्वी करण्याचं आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केल्यानंतर आघाडी सरकारनेच या बंदला पाठिंबा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajitdada Pawar) यांनीही आपण शेतकऱ्यांसह आहोत, केंद्राने केलेल्या नवीन कृषि विधेयकाला विरोध दर्शवत शांततेत बंद पाळण्याचे आवाहन केले. आजच्या बंदमध्ये महाराष्ट्र सरकारसह देशातील सर्व विरोधी पक्ष सहभागी होत आहेत. शेतकरी संघटना, हमाल माथाडी संघटना आदींचा सहभाग आजच्या बंद मध्ये आहे. गेल्या बारा दिवसांपासून शेतकरी दिल्ली येथे कृषि विधेयकाला विरोध करत आंदोलन करत आहेत.