अखेर रेणू शर्माची माघार…. धनंजय मुंडे यांना दिलासा

मुंबई, दि.२२- राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या गायक महिलेने आपली तक्रार मागे घेतली असून मुंडे यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे सदरील तक्रारीमुळे अडचणीत आले होते. रेणू शर्माने (Renu Sharma) लेखी अर्ज देवून आपली तक्रार मागे घेतली.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू शर्मा (Renu Sharma) हिने आपली तक्रार मागे घेतली आहे. पोलिसांनी (Police) तिला आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यास सांगितले होते. त्यानुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली असे ते प्रतिज्ञापत्र मुंबई पोलिसांना (Police) दिले. “मी केलेली तक्रार काही कारणास्तव मागे घेत आहे” असं प्रतिज्ञपत्र रेणू शर्मा हिने पोलिसांना लेखी दिले आहे. आता रेणू शर्मानेच तक्रार मागे घेतली त्यामुळे धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे. यापुर्वीही १५ जानेवारीला रेणू शर्माने ट्विट करुन आपण तक्रार मागे घेत असल्याचे सागंतिले होते. या प्रकरणावरुन धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांचे राजकीय भविष्य धोक्यात आले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वरिष्ठ नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहत चुकीचा पायंडा पडु देणार नसल्याची भुमिका घेतली होती. मोठ्या प्रमाणात चर्चा झालेल्या या प्रकारावर आता पडदा पडणार आहे. दरम्यान, भाजपा महिला आघाडीने याप्रकरणी केलेले आंदोलन सपशेल अयशस्वी झाले असून यात भाजपाची नाचक्की झाल्याची चर्चा होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!