परमबीर सिंह यांच्यावर पोलिस अधिकाऱ्याचा आरोप … निलंबन व रुजू करण्याचा रेट पाहुन तुम्ही व्हाल थक्क.

मुंबई दि.22 मार्च – दोन दिवसांपुर्वी परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापलं आहे. याप्रकरणी विरोधी पक्षाने देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवला असताना गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी अतिरिक्त गृह सचिवांकडे तक्रार केल्याचे पत्र सोशल मेडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये निलंबन न करण्यासाठी 50 लाख तर निलंबनानंतर पुन्हा सेवेत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे 2 कोटींची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप अनुप डांगे यांनी केला आहे.

(Police officer’s allegation against Parambir Singh … You will be surprised to see the suspension and reinstatement rate.)

मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर दोन दिवसांपुर्वी गंभीर आरोप (allegation) केला होता. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता अनुप डांगे यांनी 2 फेब्रुवारी रोजी परमबीर सिंह यांच्या विरोधात अपर मुख्य गृहसचिवांकडे केलेली लेखी तक्रार समोर आली आहे. अनुप डांगे यांनी परमीबर सिंह (Param Bir Singh) यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे (allegation) सध्या खळबळ उडाली आहे. यामुळे आता परमबीर सिंग अडचणी येण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण
गावदेवी परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या डर्टी बन्स सोबो या पबवर 22 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019 रोजी कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान पबचा मालक जीतू नावलानी याने तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात असलेल्या परमबीर यांच्यासोबत ‘घरके रिलेशन है’ असे सांगून कारवाईस विरोध केला, असं अनुप डांगे (Anup Dange) यांनी सांगितलं आहे.

या प्रकारानंतर 25 नोव्हेंबर रोजी एसीबीच्या कार्यालयातून परमबीर सिंग यांनी भेटण्यासाठी बोलावल्याचा कॉल आला. मात्र याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगताच, तत्कालीन पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी भेटीला जाण्यास नकार दिला. त्याबाबत संबंधित एसीबी कार्यालयात कळवण्यात आलं. त्यानंतर परमबीर सिंग यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच, माझ्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरु झाली.

पुढे 4 जुलै 2020 रोजी दक्षिण नियंत्रण कक्षात बदली झाली. पाठोपाठ 18 जुलै रोजी माझे निलंबन झालं. याच दरम्यान परमबीर यांचे चुलत भाऊ असल्याचे सांगून शार्दुल बायास यांनी बदली थांबवण्यासाठी 50 लाखांची मागणी केली होती. पुढे कामावर परत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे 2 कोटींची मागणी केल्याचा आरोप अनुप पांडे (Anup Dange) यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!