कोरोंना विशेष

चिंताजनक … राज्यात शनिवारी सर्वाधिक कोरोना बाधितांचा मृत्यू

मुंबई दि.28 मार्च – महाराष्ट्रात (Maharashtra) नव्या कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या वाढतच आहे. अलिकडच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. रोजचा बाधितांचा आकडा 35 हजारांच्यावर असताना शनिवारी मात्र अचानक मृतांचा आकडा वाढल्यामुळे चिंता वाढली आहे. शनिवारी 166 जणांचा मृत्यू (Deaths) झाल्याचे आरोग्य विभागाकडून माहिती आली आहे. हि सध्याची सर्वाधिक संख्या आहे.

(Worrying … most corona deaths in the state on Saturday)

राज्यात आज ३५ हजार ७२६ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासात 166 कोरोना बाधितांच्या मृत्यूची (Deaths) नोंद झाली आहे. मृत्यूची हि नोंद सध्याची सर्वाधिक असून चिंता वाढवणारी आहे. काल १४ हजार ५२३ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात ३५ हजार ७२६ नवीन नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यातील महत्त्वाचे शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा समावेश आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळत आहेत. सलग तीन दिवसांपासून पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळत होते.

शनिवारी मुंबईचा आकडा सहा हजार पार गेला आहे. मुंबईतील नव्या कोरोना बाधित (Corona Positive) संख्येत यावर्षातील सर्वाधिक वाढ शनिवारी झाली आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मुंबईत ६ हजार १२३ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून १२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २ हजार २९४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!