कोरोंना विशेष

मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता.

मुंबई दि.2 एप्रिल – राज्याची दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर हालचालीनां वेग आला आहे, दररोज कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने ठाकरे सरकारची चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचा कहर पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे, यात राज्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे, या बैठकीत राज्यात अंशत: लॉकडाऊन (lockdown) बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

(CM calls emergency meeting; Likely to be a big decision.)

गुरुवारी राज्यात 43 हजार 183 कोरोना बाधित (Corona Positive) आढळले, तर तब्बल 249 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला राज्यात 3 लाख 66 हजार 533 ॲक्टीव रुग्ण आहेत. दिवसेंदिवस नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडत आहे. सध्याचा कोरोनाचा कहर पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Udhav Thakre) आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे, या बैठकीत राज्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार असून राज्यात अंशत: लॉकडाऊन बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी नव्याने नियमावली जाहीर करत रात्रीच्या जमावबंदीचे आदेश दिले होते, परंतु अनेक ठिकाणी नियमांचे पालन केले जात नसल्याचे लोकांच्या गर्दीवरुन दिसत आहे. मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. परंतू लोकांचे सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी अनेक वेळा इशारा देवूनही नियमांचा भंग होत असल्याने कठोर निर्णय शासनाकडून घेतला जावू शकतो.

कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण (Corona Positive) वाढत असल्याने राज्यात अंशत: लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यानुसार ज्या शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, त्या ठिकाणी मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह आणि खासगी आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन (lockdown) केला जाण्याची शक्यता कमी आहे परंतु यातून मध्यममार्ग काय काढता येईल यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या, तर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या ‘वर्षा’वर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thakre) यांच्या बैठका सुरू आहेत.

मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे, मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल फक्त अत्यावश्यक सेवेसाठी व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मुंबईसह ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, त्या ठिकाणची हॉटेल्स बंद ठेवली जातील. मात्र हॉटेल्सना होम डिलिव्हरी किंवा ‘टेक अवे’ची परवानगी असेल. शॉपिंग मॉल्स १५ दिवसांसाठी बंद ठेवले जाऊ शकतात. खासगी आस्थापनांना ‘वर्क फॉर्म होम’ची सक्ती केली जाईल; मात्र प्रसिद्धीमाध्यमांना यामधून वगळण्यात येणार असल्याचं कळतंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!