रमजान ईद निमित्त निर्बंधात शिथिलता; पहा काय आहे निर्णय.

लातूर/बीड दि.11 मे – राज्यात वाढत जाणारी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्थानिक प्रशासन व राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केली आहेत. लातूर जिल्ह्यातही वाढती रुग्ण संख्या पाहता जिल्हाधिकारी (Collecter) पृथ्वीराज बी.पी. यांनी 8 ते 13 मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. मात्र रमजान ईदच्या (Ramadan Eid) कारणामुळे निर्बंध काही प्रमाणात आता शिथील केले आहेत. बीडमध्येही (Beed) काल जिल्हाधिकारी (Collecter) रविंद्र जगताप यांनी निर्बंधात दोन दिवसांसाठी अंशतः बदल केला आहे.

(Restrictions relaxed in Beed and Latur districts on the occasion of Ramadan Eid;)

लातूर जिल्ह्यात उद्या 11 मेपासून सकाळी 7 ते 12 या कालावधीत किराणा दुकान, सुकामेवा, भाजीपाला, फळ विक्री, चिकन, मटण, अंडी, मासे, बेकरी, दूध विक्री दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हातगाड्यांवर फळे, दुधासोबत चिकन मटन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातही दि.11 व 12 मे रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेची मुभा देण्यात आली आहे. तर बँकेच्या वेळातही बदल करुन सकाळी 10 ते 2 अशी मुभा देण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यात दररोज 1000 पेक्षा अधिक कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण नव्याने आढळून येत होते. त्यामुळे 8 ते 13 मे या कालावधीत विकेंड लॉकडाऊनप्रमाणे (lockdown) लागू करण्यात आले होते, मात्र रमजान ईदच्या (Ramadan Eid) कारणावरून हे निर्बंध दोन दिवसांसाठी शिथील करण्यात आले आहेत. दि.11 व 12 मे रोजी सकाळी 7 ते 12 या कालावधीत किराणा दुकान सुकामेवा, भाजीपाला, फळ विक्री, चिकन, मटन दुकाने, अंडी, मासे, बेकरी, दूध विक्री दुकाने सुरू राहणार आहेत.

12 मे रोजी केवळ हातगाड्यावर फिरून फळांची विक्री, दूध विक्री, चिकन, मटण विक्री सायंकाळी 5 ते सायंकाळी 7 या कालावधीत करता येईल. ईदनिमित्त एकाच ठिकाणी गर्दी करू नये. आपल्या घराच्या जवळच्या दुकानातून खरेदी करावी. होम डिलेव्हरीला प्राधान्य द्यावे, खरेदीसाठी वाहनाचा वापर टाळावा तसेच लातूर (Latur) शहरात किराणा भाजीपाला खरेदीसाठी गंजगोलाई, मस्जीद रोड, भुसार लाईन, सुभाष चौक, अंबा हनुमान, खोरे गल्ली, मित्र नगर, दयानंद गेट मेन रोड, राजीव गांधी चौक येथे गर्दी करू नये.

नागरिकांची गर्दी होणार नाही यासाठी दुकानदारांनी दुकानासमोर वर्तुळ काढावे त्यात गिऱ्हाईकांना उभे राहण्यास सांगावे, जीवनावश्यक वस्तु व्यतिरिक्त इतर वस्तू, सामान विक्री करू नये, 13 मे रोजी सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत सुकामेवा, फळ विक्री, चिकन, मटण विक्री सुरू राहील, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!