कोरोंना विशेष

राज्य सरकार पाठोपाठ केंद्राच्या मार्गदर्शक सुचना जारी; 30 जूनपर्यंत कडक निर्बंध.

नवी दिल्ली दि.28 मे – कोरोना संसर्गाचा प्रार्दुभाव लक्षात घेता काल राज्य सरकारने लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यापाठोपाठ केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना येत्या 30 जूनपर्यंत कडक निर्बंध (Strict restrictions) जारी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या जास्त असेल त्याठिकाणी स्थानिक पातळीवर नियंत्रण उपाययोजना केल्या जाव्यात. कोरोना रोखण्यासाठी सक्तीनं उपाययोजना लागू कराव्यात अशी सूचना केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी केल्या आहेत.

(The state government followed up with the Centre’s guidelines; Strict restrictions until June 30.)

मागील काही दिवसांपासून देशात नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याची पहायला मिळत आहे. पण आज सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत वाढ झाली. देशातील मृत्यूच्या संख्येत देखील चढउतार होत आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची परिस्थिती आणखीन नियंत्रणात आणण्यासाठी कंटेनमेंट झोनची नियमावली (guidelines) 30 जूनपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. तसेच यासंदर्भात गृह मंत्रालयाकडून राज्यांना पत्र पाठवण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेली नियमावली 30 जूनपर्यंत कायम राहिले, असे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. केंद्राने राज्य सरकारला सांगितले आहे की, ‘ज्या जिल्ह्यात अधिक कोरोना बाधित (Corona Positive) आहेत, त्या ठिकाणी स्थानिक स्तरावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयायोजना सूनिश्चित करा. कठोरपणे निर्बंध लागू केल्यामुळे दक्षिण आणि ईशान्यच्या काही भागांना सोडून संपूर्ण भारतात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण झाली आहे.’

यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात गेल्या 20 दिवसांपासून नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे सांगितले. 7 मे 2021 रोजी नवीन कोरोना बाधितांच्या संख्येने सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर आता देशातील नव्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोनाची दररोजची रुग्णसंख्या 1 हजार ते 5 हजार दरम्यान आहे. तर 13 राज्यात दररोज 1 हजार पेक्षा कमी नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद होते. तसेच मागील आठवड्यात 24 राज्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज 25 राज्यांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या एका दिवसातील नवीन रुग्णसंख्येपेक्षा कमी आहे.

दरम्यान, कोरोना संक्रमित रूग्णांचा पॉझिटिव्हिटी दर कमी होत आहे, तर दुसरीकडे ब्लॅक फंगससह (Black fungus) अन्य प्रकारची प्रकरणे वेगाने पुढे येत आहेत. सध्या फंगसच्या रूग्णांची संख्या 100 हून अधिक आहे. सध्या वैद्यकीय महाविद्यालयात 106 रूग्ण आहेत, त्यापैकी 39 रूग्णांवरही शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या रूग्णांपैकी एका रुग्णांमध्ये क्रीम फंगसची पुष्टी झाली आहे, तर 50 पेक्षा जास्त ब्लॅक फंगसचे (Black fungus) रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना संक्रमित रूग्णांमध्ये अँटीबायोटिक औषधांचा जास्त वापर शरीरात पोटात आढळणाऱ्या सिम्बायोटिक बॅक्टेरियांना (Bacteria) नष्ट करत आहे. कारण मानवी शरीरात सिम्बायोटिक बॅक्टेरिया असणे अत्यंत महत्वाची आहे. या बॅक्टेरिया (Bacteria) फंगसचे निर्मूलन करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!