खुषखबर …. शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये; 30 जूनपुर्वी करा नोंद.

नवी दिल्ली दि.28 मे – देशभरातील शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान योजनेतून (pm kisan) देशभरातील शेतकर्यांसाठी 4000 रुपये मिळवण्याची सुवर्ण संधी आली आहे. नुकताच पीएम किसान योजनेंतर्गत (pm kisan) शेतकर्यांच्या खात्यात 2,000 रुपयांचा हप्ता पाठवण्यात आला आहे. योजनेत आतापर्यंत 9 कोटीपेक्षा जास्त शेतकर्यांनी नोंदणी (Registration) केले आहे. पीएम किसान योजनेचा हेतू देशातील शेतकर्यांना आर्थिक मदत देणे हा आहे.
(Good news …. farmers will get Rs 4,000; Register before June 30.)
नवीन शेतकरी घेऊ शकतात लाभ
पीएम किसान योजने अंतर्गत आता नवीन शेतकरी लाभ घेऊ शकतात. सोप्या शब्दात सांगायचे तर तुम्ही जर शेतकरी असाल आणि सर्व आवश्यकता पूर्ण करत असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.
घरबसल्या याचा लाभ घेऊ शकता. यासाठी अधिकृत वेबसाइट – https://pmkisan.gov.in/ वर रजिस्ट्रेशन करू शकता.
अनेक शेतकरी असे सुद्धा असे आहे ज्यांना 2000 रुपयांची ही रक्कम मिळालेली नाही, कारण त्यांनी योजनेत रजिस्ट्रेशन (Registration) केले नव्हते. अशावेळी आता शेतकरी 30 जूनपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतात. यास मंजूरी मिळाली तर एप्रिल-जुलैचा हप्ता जुलैमध्ये मिळेल आणि ऑगस्टचा नवीन हप्ता सुद्धा अकाऊंटमध्ये येईल. म्हणजे दोन हप्त्यांचा लाभ मिळू शकतो.
जाणून घ्या कधीपर्यंत हप्ता?
जर एखाद्या शेतकर्याने जूनमध्ये नोंदणी केली तर त्यास योजनेचा पहिला हप्ता (8वा हप्ता) जुलैमध्ये मिळेल. त्यांना पुढील हप्ता सुद्धा मिळेल जो सरकार सामान्यपणे ऑगस्ट महिन्यात पाठवते. याचा अर्थ असा आहे की, शेतकर्याला पीएम किसान योजनेचा दुहेरी लाभ मिळेल. योजनेसाठी रजिस्ट्रेशन करताच त्यांना 4,000 रुपये मिळतील.
सध्या देशभर कोरोना संसर्गामुळे व्यापारी, उद्योजक व छोट्या व्यवसायिकांसह शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. महाराष्ट्रासह काही राज्यात तर शेतकऱ्यांना आस्मानी संकटाचाही सामना करावा लागत आहे. अवकाळी पाऊस, चक्रीवादळ व लॉकडाऊनमुळे शेतकरी देशोधडीला लागला असताना शेतकऱ्यांना ही मदत मोलाची ठरणार आहे.