शेतकरी सुखावला … मान्सूनची मराठवाड्यापर्यंत मजल; निर्धारित वेळेपूर्वीच महाराष्ट्रात दाखल.

पुणे दि.6 जून – केरळमध्ये 3 जूनला आगमन झाल्यानंतर मॉन्सूनने गेल्या दोन दिवसात वेगवान प्रवास करीत महाराष्ट्रात (Maharashtra) प्रवेश केला आहे. कोकणातील हर्णे तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर व लगतच्याच मराठवाड्यातील काही भागापर्यंत मान्सूनने मजल मारली आहे. महाराष्ट्रात इतक्या लवकर मॉन्सून (monsoon) दाखल होण्याचे हे पहिलेच वर्ष आहे.
(Pleasant … Monsoon reaches Marathwada; Arrive in Maharashtra before the scheduled time.)
नैंऋत्य मोसमी वार्यांच्या अरबी समुद्रातील शाखेने जोरदार मुसंडी मारली आहे. दक्षिण कोकणातील हर्णेपासून सोलापूरपर्यंत मॉन्सूनचे आगमन झाले असल्याचे हवामान विभागाने शनिवारी जाहीर केले. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात (Maharashtra) इतक्या लवकर मॉन्सून दाखल होण्याचे हे पहिलेच वर्ष असून गेल्या वर्षी दक्षिण कोकण, कोल्हापूरात 11 जून रोजी मॉन्सून (monsoon) दाखल झाला होता.
शनिवारी मॉन्सून हर्णे, सोलापूर, रायचूर, तिरुपती, कुडलोरपर्यंत दाखल झाला. येत्या 24 तासात मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्रातील आणखी काही भाग, कर्नाटकचा उर्वरीत भाग, आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि तामिळनाडुचा उर्वरित भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रवेश करण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण आहे़.
केरळमध्ये 3 जून रोजी आगमन झाल्यानंतर त्याने शुक्रवारपर्यंत कर्नाटकातील कारवारपर्यंत मॉन्सूनने वेगवान वाटचाल केली होती. आज त्यात आणखी प्रगती केली असून गोव्यासह कोकणातील हर्णे तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर व लगतच्या मराठवाड्यातील काही भागापर्यंत मजल मारली आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख (Meteorological Department) अनुपम कश्यप यांनी सांगितले की, मॉन्सूनने आज महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या 6 जिल्ह्यांमध्ये प्रवेश केला आहे. सर्वसाधारणपणे मॉन्सून 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो. यंदा तो काही दिवस अगोदर संपूर्ण महाराष्ट्रात पोहचणार आहे. दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टी ते दक्षिण केरळ किनारपट्टीपर्यंत द्रोणीय क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे कोकणासह या 6 जिल्ह्यात गेले दोन दिवस सर्वदूर पाऊस झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. येत्या 24 तासात कोकण व मध्य महाराष्ट्रातील आणखी काही भागात मॉन्सून पुढे वाटचाल करेल, अशी शक्यता आहे.
येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील बहुताश ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून वारे ताशी 30 ते 40 किमी वेगाने वाहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नंदुरबार, जळगाव, नांदेड, सिंधुदुर्ग, मुंबई हे जिल्हे वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
भारतात मान्सूनचा दिलासा.
मान्सून भारतात दाखल झाला आहे. बंगालचा उपसागर, हिंद महासागर आणि अरबी समुद्र या तीन ठिकाणी मान्सूनच्या आगमनाचे परिणाम दिसू लागले आहेत. केरळ, तामीळनाडू, कर्नाटकच्या अनेक भागांमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. आता 48 तासांत आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामीळनाडू, कर्नाटक आणि गोव्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस पोहोचेल.
महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्येही येत्या 24 तासात पावसाचे आगमन होईल. ईशान्य भारतातही पाऊस दाखल होईल. सोमवारपर्यंत जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे.
भारतात दाखल झालेल्या मान्सूनचे परिणाम देशभर दिसू लागतील. दिल्ली एनसीआरमध्ये पावसाची शक्यता आहे. राजस्थानच्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची तसेच वारा ताशी 20 ते 40 किमी वेगाने वाहण्याची शक्यता आहे. हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या निवडक जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. वेधशाळेच्या (Meteorological Department) अंदाजानुसार दहा जूनपर्यंत ईशान्य भारतातील सर्व राज्यांमध्ये चांगला पावसाची शक्यता आहे.