राज्यात हाय अलर्ट; पुढील 5 दिवसात अतिवृष्टी होण्याचा इशारा.

मुंबई दि.9 जून – मान्सून (Monsoon) राज्यात सक्रीय झाला आहे. अनेक जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पावसासह अतिवृष्टी (Heavy Rains) होण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (Weather Alert) दिला आहे. तर दुसरीकडे मुंबईत आज मान्सूनचे आगमन झाले. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस (Mumbai Rain) झाल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाल्याचे पाहायला मिळाले. कोकणातही मुसळधार पावसासह ढगफुटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

(High alert in the state; Warning of heavy rain in next 5 days.)

हवामान विभागाने (Weather Alert ) अंदाज वर्तवल्याप्रमाणे आता रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस महत्वाचे आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या जोरदार पाऊस कोसळत आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात 11 आणि 12 जून रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा पाऊस ढगफुटीप्रमाणे असेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी खबरदारीचा आदेश दिला आहे.

पहिल्याच पावसाने मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले आहे. चेंबूर परिसरात देखील पावसाचा जोर दिसून येत आहे. चेंबूरमध्ये पावसामुळे नागिरकांना वाहतुकीला त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी प्रशानसाकडून आश्वसन देऊनही काम योग्यरित्या होत नसल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पश्चिम उपनगरात बोरिवली, कांदिवली, अंधेरी, मालाड, जोगेश्वरी भागात अधून मधून सतत पावसाच्या सरी सुरू आहेत. त्यामुळे काही सखल भागात पाणी जमा होण्यासाठी देखील सुरू झाले आहे.

मुंबईच्या गांधी मार्केट भागातही काही सखल भागात पाणी साचले आहे. अनलॉकमुळे कार्यालय 40 टक्के उपस्थितीने सुरु झाल्यामुळे ऑफीस गाठण्यासाठी नागरिक पाण्यातून कसरत करावी लागत आहे. तर खासगी वाहनांनाही धिम्यागतीने पाण्यातून गाड्या काढव्या लागत आहेत.

बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर परिसरात रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. मात्र अद्याप कुठेही पाणी साचल्याची घटना समोर आली नाही हवेत गारवा निर्माण झाल्याने काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

हवामान खात्याच्या (Meteorological Department) अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सर्व यंत्रणां सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. कल्याण डोंबिवली परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस सुरु होता. पावसामुळे कल्याण पूर्वेत एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याचा प्रकार घडला आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नसून भिंतीमुळे रस्ताही खचला आहे.

वसई-विरारमध्ये काल रात्रीपासून रिमझिम पाऊस बरसतोय. पावसामुळे शहरातील सखल भाग जलमय झालेले पाहायला मिळाले. विरार,नालासोपारा आणि वसई शहरातील काही सखल रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे सकाळीच कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांना त्यातून वाट काढणे कसरतीचे झाले.

महाराष्ट्राच्या दक्षिणेत मान्सून (Monsoon) दाखल झाल्यापासून राज्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने (rain) हजेरी लावली आहे. आज सकाळपासून मुंबईसह परिसरात रिमझिम पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यानंतर आता पुढील तीन तासांत मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पावसचा (rain) इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. याशिवाय प्रशासनाला सज्ज राहण्याचा सल्ला हवामान खात्यानं (Meteorological Department) दिला आहे.
सध्या मान्सूनने महाराष्ट्रात दक्षिण भागासह पुणे, रायगड, अलिबाग या परिसरात धडक मारली आहे.

या जिल्ह्यात मुसळधार
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्यात पुढील दोन ते तीन तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाला सुरुवात झाली आहे.
विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाण्यात विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरु झाला आहे. दोन दिवसात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, परभणीमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!