चिंतातूर शेतकऱ्यांना दिलासा… राज्यात मान्सून सक्रीय.

बीड दि.6 जुलै – महाराष्ट्रात (Maharashtra) जून महिन्यात दरवर्षीपेक्षा मान्सून पावसाने हजेरी लावली होती. सुरुवातीला झालेल्या, पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी काही ठिकाणी प्रमाणात पेरणी केली होती. राज्यामध्ये जूनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पावसाने दांडी मारली आहे. मान्सूनने हि दांडी मारल्याने राज्यातील 6 जिल्हे दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. यातच सोमवारी काही जिल्ह्यात मान्सून सक्रीय झाला असून बीड जिल्ह्यातही मंगळवारी पहाटे पासुन पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या जिल्ह्यातील चिंतातूर शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
(Relief to anxious farmers … Monsoon active in the state.)
महाराष्ट्रामधील औरंगाबाद (Aurangabad), बीड (Beed), नंदुरबार, नाशिक, अकोला आणि धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान खात्याने (weather department) राज्यामधील काही भागात 7 आणि 8 जुलैला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व पूर्व विदर्भातील या जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रामध्ये मान्सूनच्या (Monsoon) आगमनाच्या वेळी आलेल्या पावसाच्या जोरावर 22 जूनपर्यंत 27 टक्के पेरण्या पार पडले होते. मात्र, परत पडणाऱ्या पावसात खंड पडला यामुळे पेरणी केलेले शेतकरी संकटात सापडले आहेत. पावसाने दांडी मारल्याने, शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कापूस, मका ,तूर व सोयाबीनच्या पिकांनी माना टाकल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, हवामान खात्याने 7 जुलैपासून पावसाचे पुनर्आगमानाचे संकेत दिले असले तरी सोमवार दि.5 जुलैपासून मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस परतला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, धारुर, केज, वडवणी व माजलगाव तालुक्यात मंगळवारी पहाटेपासूनच दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे हवालदिल शेतकरी सुखावला आहे.
भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) पुढील 5 दिवसांचा अंदाज वर्तविला आहे. या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात जोरदार पाऊस 7 आणि 8 जुलैला पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या 2 दिवशी महाराष्ट्रामध्ये ढगांच्या गडगडाटासह राज्यामध्ये पाउसाची हजेरी लागणार आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यामधील नागरिकांनी हवामान खात्याच्या (weather department) पुढील अपडेटस घेत राहावे, असे देखील सांगण्यात आले आहे.
नाशिक, धुळे, अकोला व नंदुरबार जिल्हया दुष्काळाच्या छायेत आहेत. यंदा 25 ते 50 टक्के कमी पाऊस झाल आहे. नंदुरबार मध्ये 50 टक्के पेक्षा कमी पाऊस झाले आहे. नाशिक, धुळे, अकोला मध्ये 25 टक्के कमी पाऊस झाल्याने दुष्काळाचे सावट आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. निम्म्या महाराष्ट्रामध्ये पेरणीसाठी योग्य पाऊस नसल्याचे दावा अभ्यासकांनी केल आहे.
मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रीय…
राज्यात पावसाने दीर्घ दडी मारली असल्याने पाणीसाठे आणि खरिपातील पेरण्यांबाबत चिंता व्यक्त होत असतानाच पाऊस पुन्हा सक्रिय होणार झाल्याने आनंददायी संकेत भारतीय हवामान शास्त्र विभागाने (Indian Meteorological Department) दिले आहेत. 8 जुलैपासून कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर 10 जुलैनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण मध्य भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
जून महिन्यात राज्यात मोसमी पावसाचे आगमन झाल्यानंतर बहुतांश भागात जोरदार पाऊस कोसळला. मात्र, जूनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात (Marathwada) जवळपास सर्वच ठिकाणी पाऊस गायब झाला. सध्या कोकणातही पाऊस घटला आहे.
विदर्भात तुरळक भागांत हलका पाऊस झाला. बहुतांश भागात खरिपाच्या पेरण्या झाल्या असल्याने आणि काही ठिकाणी त्या रखडल्याने पावसाची वाट पाहिली जात आहे. पावसाची विश्रांती लांबल्यास दुबार पेरणीची टांगती तलवार शेतकऱ्यांवर आहे. त्याचप्रमाणे जलसाठय़ांवरही सध्या परिणाम दिसून येतो आहे. अशा वातावरणात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार देशाचा पश्चिम किनारा, पूर्व-मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पात मोसमी पाऊस 8 जुलैपासून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. या काळात कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली आदी भागांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात आणि उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यावर 11 जुलैला कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. कमी उंचीवरून बाष्पयुक्त वारे वाहणार आहेत. त्यामुळे पश्चिम-उत्तर भागात रखडलेला मोसमी पाऊस सक्रिय होण्यासह 10 जुलैपासून मध्य भारतात पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे.
तापमानवाढ कायम
पावसाने दडी मारल्यानंतर गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. सोमवारीही (5 जुलै) तापमानवाढ कायम होती. सर्वाधिक तापमानवाढ विदर्भात असून, अकोला येथे राज्यातील उच्चांकी 38.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात सर्वच ठिकाणी तापमान 35 ते 38 अंशांदरम्यान आणि सरासरीपेक्षा 2 ते 5 अंशांनी अधिक आहे. मराठवाड्यात (Marathwada) औरंगाबाद, परभणीत कमाल तापमान सरासरीपेक्षा 4.5 अंशांनी अधिक आहे. कोकण विभागात मुंबईसह सर्वच भागात सरासरीपेक्षा 2 ते 3 अंशांनी पारा वाढला असून, मध्य महाराष्ट्रात पुणे, महाबळेश्वर, सातारा, नाशिकमध्ये सरासरीच्या तुलनेत 4 ते 5 अंशांनी तापमान वाढले आहे.