परभणीत रेकॉर्डब्रेक पाऊस; 233 मेंढ्या दगावल्या… राज्यात रेड अलर्ट.

परभणी दि.13 जुलै – गेल्या तीन दिवसात मराठवाड्यात (Marathwada) बहुतांश जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. परभणी जिल्ह्यात तर आभाळच कोसळलंय. अतिपावसामुळे परभणीत शेती व पिकांसह जनावरांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. ओढ्या नाल्या, नद्यांना आलेल्या अचानक पुरामुळे जीवितहाणी मोठ्या प्रमाणात झाल्याचं समोर येतं आहे. यात शिर्सी बुद्रुक या गावात 233 मेंढ्या दगावल्या आहेत.
(Record-breaking rain in Parbhani; 233 sheep slaughtered … Red alert in the state.)
233 मेंढ्या दगावल्या
परभणी (Parbhani) जिल्ह्यातील शिर्सी बुद्रुक या गावात 233 मेंढ्या दगावल्या आहेत. या मेंढ्या 10 मेंढपाळांच्या आहेत. सर्वच्या सर्व मेंढ्या अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं मेंढपाळांनी सांगितलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसामुळे मेंढ्या मरण्याची कदाचित ही पहिलीच घटना असेल. ह्या एका घटनेमुळे मेंढपाळांचं लाखो रुपयांचं नुकसान
झालं. त्याची भरपाई केली जावी अशी मागणीही होत आहे.
परभणीत रेकॉर्डब्रेक पाऊस
परभणी हा तसा कोरडा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण इथं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे तीनही ऋतू तीव्र असतात. नाही पडला तर पाऊसच पडत नाही आणि एकदा पडायला लागला तर थांबत नाही असे प्रसंग इथं अनेक वेळेस घडतात. त्याचीच पुन्हा प्रचीती आलीय. 24 तासात तब्बल 232 मिमी. एवढ्या रेकॉर्डब्रेक (Record-breaking) पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे हा पाऊस जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आहे.
राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट
IMD ने आजपासून पाच दिवसांसाठी राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. दोन दिवसात मराठवाडा आणि कोकणात पावसानं चांगलंच झोडपून काढलं. पुढचे तीन दिवस अजूनही मुसळधार पावसाची (heavy rain) शक्यता आहे. त्यामुळेच विदर्भ मराठवाड्यातही काळजी घेणं गरजेचं आहे.
14 आणि 15 जुलै रोजी राज्यात पावसाची काय स्थिती
हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर, पुणे, ठाणे, पालघर, मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मराठवाड्यातील (Marathwada) जालना, औरंगाबाद लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीला येलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.