माझं गाव

अरणवाडी साठवण तलावावर ग्रामस्थांचा जागर; ग्रामस्थ आक्रमक.

किल्लेधारूर दि.25 जुलै – येथील धारुर घाट (Dharur Ghat) पायथ्यावरील अरणवाडी साठवण तलाव (Storage pond lake) सध्या प्रशासन व ग्रामस्थ यांच्या वादामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. काल प्रशासनाकडून स्थळ पाहणी केल्यानंतर ग्रामस्थांचा विरोध मोडून रात्रीतून सांडवा तोडण्याची शक्यता गृहित धरुन अरणवाडी ग्रामस्थांनी चक्क तलावावर जागरण केल्याचे दिसून आले. यामुळे अरणवाडी व परिसरातील ग्रामस्थांचा आक्रमकपणा समोर आला. रात्री एकच्या सुमारास पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यानी पाण्याचा विसर्ग केल्यानंतर पुन्हा सांडवा पुर्ववत बांधून देण्याचे लेखी आश्वासन ग्रामस्थांना दिले.

(Awareness of villagers on Aranwadi storage lake; Villagers aggressive.)

राष्ट्रीय महामार्ग (National Highway) 548 सी या रस्त्यावर धारुर ते माजलगाव दरम्यान धारुर घाटाखाली आरणवाडी साठवण तलावाचे काम यावर्षीच पूर्ण करण्यात आले आहे. पहिल्याच पावसाळ्यात तलावात 85 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून दि.23 रोजी तलावावरील सांडवा तोडण्यावरुन ग्रामस्थ व पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांत वादविवाद झाला.

पहिल्याच वर्षी 85 टक्के पाणी साठी साचला. यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ समाधान व्यक्त करत असताना प्रशासनाकडून सांडवा तोडण्याची घेतलेली भुमिका संशयास्पद वाटल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. अनेक आंदोलन करुन पुर्णत्वास आलेल्या तलावात सुदैवाने चांगला पाणीसाठा आला असताना प्रशासकीय यंत्रणा सांडवा फोडुन पाण्याची नासाडी करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तर रस्ते विकास महामंडळ व पाटबंधारे खाते आपल्या चुका झाकण्यासाठी सांडवा तोडत असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.

शनिवारी दि.24 रोजी घटनास्थळी पाटबंधारे खात्याचे (Department of Irrigation) कार्यकरी अभियंता यु. व्ही. वानखेडे, उपविभागीय अधिकारी नमृता चाटे, तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी भेट दिली.यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल शिनगारे, बालासाहेब चव्हाण, सदाशिव शिनगारे, लहु फुटाणे, भागवत शिनगारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतू ग्रामस्थांनी सांडवा तोडू देणार नसल्याची भुमिका घेतली. यामुळे या प्रश्नी तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, ग्रामस्थांनी आक्रमक (aggressive) भुमिका घेतली असून इतर मार्गाने पाणी सोडून रस्तेकामाची चौकशीच्या मागणीचे निवेदन दिले आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तलाव क्षेत्रात येणाऱ्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट करण्यात आलेले आहे. हा रस्ता खचण्याची शक्यता असल्याने हा खटाटोप असल्याचे ग्रामस्थ बालासाहेब चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. प्रशासकीय अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट झाल्यानंतर यातून तोडगा निघू शकला नाही. यामुळे रात्रीतून सांडवा तोडण्याची शक्यता गृहीत धरुन अनेक ग्रामस्थ कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल शिनगारे, बालासाहेब चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तलावावर जागून होते.

प्रशासनाकडून लेखी आश्वासन.
सदरील प्रकार प्रशासनाच्या लक्षात येताच रात्री एकच्या सुमारास पाटबंधारे खात्याचे वरिष्ठ अधिकारी व पोलिस प्रशासनाने अरणवाडी साठवण तलावावर ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांना तलावाचे पाणी विसर्ग केल्यानंतर पुन्हा सांडवा पुर्ववत करण्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी ग्रामस्थांनी माघार घेत रस्त्याच्या कामासाठी अॉगस्ट महिन्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!