प्रियंका गांधीसह अनेक विरोधी पक्षनेते नजरकैदेत; उत्तर प्रदेशात हिंसाचार.. 8 शेतकरी ठार.

लखनौ (वृत्तसंस्था) दि.4 अॉक्टोंबर – आंदोलक शेतकरी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री (Union Minister of State) अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यात रविवारी झालेल्या संघर्षात 8 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यातच शेतकऱ्यांच्या भेटीला निघालेल्या काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी (Congress Secretary Priyanka Gandhi) यांना पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतलं आहे. तर विरोधीपक्षाचे अनेक नेते नजरबंद आहेत.
(Several opposition leaders, including Priyanka Gandhi, in custody; Violence in Uttar Pradesh .. 8 farmers killed.)
लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या हिंसाचारात (violence) आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, या प्रकरणात अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार होत्या. प्रियंका गांधी लखीमपूरच्या दिशेनं रवाना झाल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी (Uttar Pradesh Police) हरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोखलं. त्यानंतर त्यांना सीतापूर जिल्ह्यातील विश्रामगृहावर नेण्यात आलं असून, नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.
दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री (Chief Minister) चरणजित सिंग चन्नी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी लखीमपूर खीरीला भेट देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेनंतर उत्तर प्रदेश सरकारने उत्तराखंड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या विमानांना लँडिंग करण्यास परवानगी न देण्याचे आदेश लखनऊ विमानतळाच्या संचालकांना देण्यात आले आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या घराबाहेरही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अखिलेश यादव हे लखीमपूर खीरीला भेट देणार आहेत. त्याआधीच त्यांच्या विक्रमादित्य मार्गावरील निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येनं पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
रविवारी झाला हिंसाचार…
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी भागातील तिकुनिया परिसरात रविवारी हिंसाचाराची घटना घडली. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाचे शेतकरी निदर्शनं करत होते. यावेळी झालेल्या हिंसाचारात 8 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. निदर्शनं करत असलेल्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनीने गाडीखाली चिरडल्याचा आणि गोळीबार केल्याचा दावा किसान मोर्चानं केला आहे.
किसान मोर्चानं केलेला दावा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी फेटाळून लावला आहे. माझा मुलगा आशिष मिश्रा टेनी सकाळी 11 वाजल्यापासून कार्यक्रमाचा समारोप होईपर्यंत कार्यक्रमाच्या ठिकाणीच होता. काही समाजकंटकांनी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करून 4-5 जणांची हत्या केल्याचा आरोप अजय मिश्रा टेनी यांनी केला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी येथे झालेल्या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या भेटीला निघालेल्या काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
या घटनेनंतर उत्तर प्रदेशच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रियंका गांधी रात्री उशिराच लखनऊ (Lucknow) येथे दाखल झाल्या. त्यानंतर त्या थोड्या वेळाने लखीमपूरच्या खीरीसाठी रवाना झाल्या. पण पोलिसांनी त्यांना हरगावजवळच अडवलं आणि ताब्यात घेतलं. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात गरमा गरमी पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर शेतकरी आणि जनतेसह विरोधीपक्षातील राजकीय नेतेही संतापले आहेत. शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेल्या अनेक नेत्यांना पोलिस प्रशासनाने रस्त्यातच अडवलं. प्रियंका गांधी, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आणि बसपाचे नेते सतीश मिश्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.