कोरोंना विशेष

पुन्हा निर्बंध … मुख्यमंत्री ठाकरे घेणार अंतिम निर्णय; राजेश टोपे यांची माहिती.

मुंबई दि.29 अॉगस्ट – केंद्राने राज्याला केलेल्या सुचनांनूसार (guidelines) केंद्र सरकारच्या शिफारसीनंतर राज्यात लवकरच निर्बंध (restrictions) लावण्याची शक्यता आहे. केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव (Corona outbreak) बघता सणासुदीचा काळात आता विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे रात्रीची संचारबंदी (night curfew) लावण्याची शक्यता वर्तवली आहे. या बाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री ठाकरे घेतील अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जालना मध्ये माध्यमाशी बोलताना दिली.

(Restrictions again … CM Thackeray to take final decision; Information of Rajesh Tope.)

कोरोनाची दुसरी लाट (Second wave) ओसरल्याचे चित्र असतानाच गेल्या आठवड्यात केरळ आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित (Corona positive) रुग्ण वाढले आहेत. तिसऱ्या लाटेची (Third wave) शक्यता गृहित धरुन प्रशासन अलर्ट असताना या दोन राज्यात वाढलेली रुग्ण संख्या केंद्र सरकारसाठी चिंतेची ठरत आहे. यातूनच केंद्राने केरळ व महाराष्ट्र (Kerala and Maharashtra) राज्याला पत्र लिहले आहे.

सध्या केरळ मध्ये ओणम सणामुळे कोरोना चे प्रकरण वाढले आहे. कोरोनाने पुन्हा आपले डोकं वर काढले आहे. केरळ मध्ये सध्या केरळच्या मुख्यमंत्रानी रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजे पर्यंत संचार बंदी लागू केली आहे. सध्या केरळ मध्ये कोरोनाचा संसर्ग (Corona infection) जास्त वाढले आहे. त्याच्या नंतर महाराष्ट्राचा नंबर आहे. यामुळे केंद्र सरकारची चिंता वाढत आहे.

याला विचारात घेता केंद्र सरकार ने या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून रात्रीची संचारबंदी चा विचार करण्यास सांगितले होते. केरळ मध्ये रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. महाराष्ट्रात रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!