माझं गाव

धारुर परिसर… चूका झाकण्यासाठी अरणवाडी तलावाचा सांडवा तोडण्याचा प्रयत्न; ग्रामस्थांचा विरोध.

किल्लेधारूर दि.24 जुलै – राष्ट्रीय महामार्ग (National Highway) 548 सी या रस्त्यावर धारुर ते माजलगाव दरम्यान धारुर घाटाखाली आरणवाडी साठवण तलावाचे (Storage pond Lake) काम यावर्षीच पूर्ण करण्यात आले आहे. पहिल्याच पावसाळ्यात तलावात 85 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून काल सांयकाळी दि.23 रोजी सदरील तलावाचे नवीन केलेल्या सांडव्याला तोडण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले. सदरील प्रकार ग्रामस्थांनी हाणून पाडला असून प्रशासकीय यंत्रणा स्वतःच्या चूका झाकण्यासाठी असा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

(Dharur area … Attempt to break the drain of Aranwadi lake to cover mistakes; Opposition of the villagers.)

पंधरा वर्षांपासून प्रलंबित पडलेल्या अरणवाडी साठवण तलावाचे काम आ.प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या प्रयत्नांतून नुकतेच पुर्ण झाले आहे. विशेष म्हणजे सदरील तलावात पहिल्याच वर्षी 85 टक्के पाणी साठी साचला. यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ समाधान व्यक्त करत असून लवकरच आ.सोळंके यांच्या हस्ते तलावाचे जलपुजन करण्याचे नियोजन करण्यात येणार होते.

परंतू मध्येच अरणवाडी साठवण तलाव वेगळ्याच कारणाने चर्चेत आले. दि.23 रोजी दुपारनंतर या तलावाचे नुकतेच केलेले नवीन सांडवा तोडण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभागाकडून (Department of Irrigation) सुरु असताना ग्रामस्थांनी गोंधळ घातला. अनेक आंदोलन करुन पुर्णत्वास आलेल्या तलावात सुदैवाने चांगला पाणीसाठा आला असताना प्रशासकीय यंत्रणा सांडवा फोडुन पाण्याची नासाडी करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तर रस्ते विकास महामंडळ व पाटबंधारे खाते आपल्या चुका झाकण्यासाठी सांडवा तोडत असल्याचा आरोप या भागातील ग्रामस्थ बालासाहेब चव्हाण यांनी केला.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) तलाव क्षेत्रात येणाऱ्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट करण्यात आलेले आहे. केवळ माती भराव करुन तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील रस्त्याची उंची वाढवण्यात आलेली आहे. सध्या पाण्याची पातळी वाढली असून 85 टक्के पाणी तलावात साचले आहे. यामुळे रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. आणखी पाणी साठा वाढल्यास रस्त्यासाठी वापरलेली माती खचून रस्ता बंद पडू शकतो. यामुळे तलावात केवळ 80 टक्के पाणीसाठा ठेवावा असे पत्र रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) देण्यात आले आहे.

आज घटनास्थळी महाराष्ट्र रस्ते विकास महा मंडळासह (Maharashtra State Road Development Corporation) पाटबंधारे खात्याचे (Department of Irrigation) अधिकारी भेट देणार असल्याचे कळते. काल सांयकाळी गोंधळ वाढल्यामुळे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. सहाय्यक पोलिस निरिक्षक (API) सुरेखा धस यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी धस यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते (NCP) माधव निर्मळ यांनीही घटनास्थळी भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी सांडवा तोडू देणार नसल्याची भुमिका घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!