माजलगावात प्रशासनाचा दणका; दहा हॉटेलवर कारवाई… धारुरातही थातूरमातुर कारवाई.

माजलगाव/धारुर दि.2 अॉगस्ट – बीड जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध पाळण्याचे सक्त निर्देश असताना अनेक व्यवसायिक निर्बंध (restrictions) झुगारुन व्यवसाय करत आहेत. यातच शनिवार रविवार विकेंड लॉकडाऊन (weekend lockdown) असताना कोरोनाची नियमावली मोडून हॉटेल व्यवसाय करणाऱ्या दहा हॉटेल चालकांवर शनिवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास माजलगाव येथे महसूल व नगरपरिषदेच्या पथकामार्फत दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. तर धारुर शहरातही शनिवारी प्रशासनाकडून थातूरमातुर कारवाईचा दिखावा करण्यात आला आहे.
(Administration crash in Majalgaon; Action on ten hotels … action in Dharur too.)
बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्ण (Corona patients) नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांसाठी नियमावली तयार केलेली आहे. त्यानुषंगाने हॉटेल व्यावसायिकांसाठी फक्त पार्सल सुविधेसाठी परवानगी देण्यात आली आहे, तरीही शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यावसायिकांसह इतर व्यवसाय राजरोस उघडे ठेवत असल्याचे दिसून येते.
माजलगावात कारवाई
नियमभंग करणाऱ्या व्यवसायिक व हॉटेल चालकांविरुद्ध पथकाने संयुक्तिक मोहीम राबवली. या दरम्यान ग्रामीण भागात पात्रुड येथे आठ हॉटेल चालकांवर तहसीलदार वैशाली पाटील यांनी दंडात्मक कारवाई करून, प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. यावेळी त्यांच्यासोबत नायब तहसीलदार साबणे, तलाठी रामकिसन इंगळे, केरबा तपसे, शिवहर शेटे, भुजंगा गायकवाड इत्यादी कर्मचारी सहभागी झाले होते.
धारुरातही झाली कारवाई.
दरम्यान, जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या सक्त निर्देशानंतर धारुर शहरातही कारवाईसाठी शनिवारी प्रशासकीय अधिकारी रस्त्यावर उतरले होते. शनिवारी महसुल, पोलिस व नगर परिषद प्रशासनाचे पथकाने दौरा केला. मात्र शनिवारी केवळ दोन दुकांनावर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे प्रशासनाकडून केवळ 200 व 500 असा दंड करुन समज दिली जात आहे. संपूर्ण दिड वर्षात प्रशासनाकडून एकही मोठी कारवाई झालेली नसल्याने व्यवसायिकासह नागरिकही निर्डावलेले दिसत आहेत.
भाजी विक्रेत्यांमुळे वाढली डोकेदुखी
प्रशासनासमोर सर्वात जास्त डोकेदुखी फळ व भाजी विक्रेत्यामुळे वाढत आहे. शहरातील हनुमान चौकात भाजी विक्रेते सर्रास गर्दी करत असल्याचे दिसत आहे. याबाबत अनेक वेळा निवेदनाद्वारे मागणी करुनही नगर परिषद ठोस भुमिका घेत नसल्याचे दिसुन येते. सहाय्यक पोलिस निरिक्षक (API) सुरेखा धस यांच्याकडून मात्र दररोज याभागात फेरी मारुन सुचना दिली जात असताना विक्रेते याकडे डोळेझाक करत आहेत.