आठ महिन्या नंतर ३० शाळाच्या आवारात विद्यार्थ्याची वर्दळ;

किल्लेधारूर दि.२३(वार्ताहर) धारूर तालूक्यात आठ महिन्या नंतर ९ वी ते १२ वी वर्गाच्या शाळा School सुरू होताच पहिल्या दिवशी तिस शाळेत ५२१ विद्यार्थी उपस्थीती होती. गटशिक्षणाधिकारी गौतम चोपडे यांनी स्वतः शाळाना भेटी देऊन कोरोना Corona प्रादूर्भाव रोकण्या साठी सर्व नियमाचे पालन करून वर्ग सुरू ठेवण्याचे सुचना केल्या.
धारूर तालुक्यात तिस शाळामध्ये ९ वी ते १२ इयत्तेत ५५५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. तब्बल आठ महिन्या नंतर सोमवारी २३ नोव्हेंबर पासून शाळा School सुरु झाल्या. पालकांचे संमती पत्र घेऊनच मुलाला वर्गात प्रवेश देण्यात आले. पहिल्या दिवशी दहा टक्के विद्यार्थी शाळे मध्ये उपस्थित असल्याचे लक्षात आले. ५२१ विद्यार्थ्यांनी तीस शाळांमध्ये उपस्थिती लावली. शाळा School सर्व प्रकारच्या दक्षता बाळगून शाळा सुरू करत आहेत. सॅनिटायझर मास्क विद्यार्थ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे शाळा ही इतर सर्व दक्षता घेत आहेत. गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने आज स्वतंत्र पथके नेमून तालुक्यातील सर्व शाळांच्या परिस्थितीची पाहणी केली. गटशिक्षणाधिकारी गौतम चोपडे यांनीही काही शाळांना भेटी दिल्या व सूचना करून परिस्थितीची पाहणी केली. दिवसा निहाय विद्यार्थी संख्या वाढेल असे हि गटशिक्षणाधिकारी गौतम चोपडे यांनी सांगीतले.