मुंबई दि.5 जुलै – राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्य सरकार एमपीएससी (MPSC) बाबत गंभीर नाही. राज्यातील लाखो मुलं परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. अशावेळी सरकार आणि आयोग नेमकं काय करतंय? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी यावेळी केला. देवेंद्र फडणवीसांच्या या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 31 जुलै 2021 पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा अधिवेशनात केली.
(All the vacancies of MPSC will be filled by 31st July 2021- Deputy Chief Minister Ajit Pawar)
अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “राज्यात सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे. आजच विधेयक मांडू आणि ते आजच पास करू असा कारभार रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्य सरकारवर केली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीची (MPSC) परीक्षा देणाऱ्या स्वप्नील लोणकर आत्महत्या (suicide) प्रकरणावरुन राज्यात वातावरण चांगलचं तापल्याचं दिसून येत आहे. अधिवेशनात देखील विरोधकांनी एमपीएससीवरुन प्रश्न उपस्थित करत सरकारला कोडींत पकडण्याचा प्रयत्न केला.
देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एमपीएससी परीक्षेचा मुद्दा उपस्थित करत अधिवेशनाच्या कामकाजात इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवून आधी एमपीएससीवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. यावेळी एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर याची सुसाईड नोट सभागृहात वाचून दाखवली. राज्य सरकार (MPSC) बाबत गंभीर नाही. राज्यातील लाखो मुलं परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. अशावेळी सरकार आणि आयोग नेमकं काय करतंय? असा सवाल फडणवीसांनी यावेळी केला. देवेंद्र फडणवीसांच्या या मागणीनंतर उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांनी 31 जुलै 2021 प्रयंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा अधिवेशनात केली.
स्वप्नील लोणकरची आत्महत्या (suicide) ही अत्यंत वेदनादायी घटना आहे, राज्यात यापुढे अशा कोणत्याही घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारां नी 31 जुलैपर्यंत एमपीएससी च्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली. राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एमपीएससी च्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या.