महाराष्ट्रात निसर्गाचा कोप… महाडमध्ये आढळले 35 जणांचे मृतदेह; आणखी 40 बेपत्ता.

रायगड दि.23 जुलै – रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महाड (Mahad) तालुक्यातील तळई येथे दरड कोसळून 32 घरे दबली गेली सकाळी मदत व बचाव कार्य सुरू होते. आतापर्यंत 35 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे, आणखी 40 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

(Anger of nature in Maharashtra … 35 bodies found in Mahad; Another 40 missing.)

हेलिकॉप्टरची मदत.
महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या (Helicopter) सहाय्याने सुरुवात झालेली आहे. अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला (Rescue squad) ते दिसतील यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मुख्यमंत्र्यांची खबरदारीची सुचना.
बचाव कार्य व रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरू करावे. महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवावे. माणगाव येथे गरजूंना फूड पाकिटांचे वितरण करण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. महाडमधील परिस्थितीत कोविड तसेच इतर रुग्णांना असुविधा होऊ नये याची खबरदारी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. एमआयडीसीचे अग्निशामक दलदेखील (Fire brigade) मदत कार्यात उतरले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

राजकीय व्यक्ती घटनास्थळी.
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार भरत गोगावले घटनास्थळी दाखल झाले आहेत, त्यांनी मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!