कोरोंना विशेष

कोरोना निर्बंध लागू करा; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सुचना… महाराष्ट्रात निर्बंध कायम.

नवी दिल्ली दि.15 जुलै – भारतामध्ये सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू घट होत असताना पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशातील निर्बंध (restrictions) देखील शिथिल करण्यात आले होते. पण आता कोरोनाच्या डेल्टा प्लस (Delta plus) या नव्या विषाणूमुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यातच भारतात तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

(Apply corona restrictions; Notice to the states of the Union Home Ministry … Restrictions remain in Maharashtra.)

भारतामध्ये संभाव्य तिसरा लाटेचा (Third wave of corona) धोका लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून कोरोना निर्बंध (restrictions) पुन्हा एकदा लागू करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. सर्व राज्यातील मुख्य सचिव आणि महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने (Union Home Ministry) पत्र लिहून सूचना केले असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच गर्दीच्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आणणे ही सर्वस्वी राज्याची जबाबदारी असल्याचं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी राज्यांनी विशेष प्रयत्न केले पाहिजे, असे देखील म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या (Union Home Ministry) गृह सचिवांनी कोरोनाचे नियम न पाळणार्‍या व कोरोना उद्रेकास (corona outbreak) कारणीभूत ठरत असलेल्या राज्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन (lockdown) लावा असे म्हटले आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी पत्र लिहून सर्व राज्यांना सूचना केल्या आहेत.

महाराष्ट्रात निर्बंध कायम- राजेश टोपे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक काल पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनास्थिती आणि लसीकरणावर (vacccination) सविस्तर भाष्य केलं. येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात केंद्राकडून सरकारकडून साडेचार कोटी लसी मिळण्याची शक्यता आहे, अशी राजेश टोपे यांनी माहिती दिली. कोव्हीड अनुषंगाने बैठकीत आढावा घेण्यात आला.

संपूर्ण राज्यात लेव्हल 3 च्या अनुषंगाने नियम आखले आहेत. कोणत्याही पद्धतीची शिथिलता नाही. मुंबईत येणाऱ्यांनी 2 डोस घेतले असतील तर त्यांना मुंबईत विना आरटीपीसीआर शिवाय येता येणार नाही. व्यापाराच्या मागण्यांवर येत्या काही दिवसात निर्णय होईल. व्यापारी वर्गाची वेळ मर्यादा आणि हॉटेल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!