शिवसेनेने रिकाम्या खुर्चीस निवेदन देताच मुख्याधिकारी प्रकटले…..!

कुंडलिका योजने प्रश्नी आंदोलनाचा इशारा.

किल्लेधारुर दि.१०(वार्ताहर)- शिवसेनेच्या वतीने आज किल्लेधारूर (Dharur) नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांना कुंडलिका पाणी पुरवठा योजने प्रकरणी निवेदन देण्यासाठी गेले असता गैरहजर असलेल्या मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला निवेदन देण्याचा कार्यक्रम घेण्याची नामुष्की आली. रिकाम्या खुर्चीला निवेदन देताच गैरहजर असलेले मुख्यधिकारी मात्र तत्परतेने हजर झाले. यावेळी शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीने रखडलेली कुंडलिका पाणी पुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु करा नसता तीव्र आंदोलन करत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला.

शहराच्या पाणी प्रश्नावर कायमचा तोडगा काढून तत्कालीन महसुल राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी सुजल योजनेतून २२ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली. यावेळी तत्कालीन नगर परिषदेच्या विरोधी पक्षाने या योजनेत आडकाठी घालत योजनेचे काम थांबवले होते. सत्ताधारी व विरोधक यांच्या धोरणामुळे शहरातील रस्ते, नाली आदीसारखे विकासकामे रखडली आहेत. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून सदरील योजनेच्या पाण्या पासून वंचित राहिली आहे. या रखडलेल्या कामाची निविदा काढून तात्काळ काम सुरु करावे नसता दि.१५ फेब्रुवारी नंतर धारुर (Dharur) नगर परिषद कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी शिवसेनेचे (Shiv Sena) तालुका प्रमुख नारायण कुरुंद, माजी तालुका प्रमुख विनायक ढगे, शहर प्रमुख बंडु शिनगारे, तालुका संघटक राजकुमार शेटे, उपतालुका प्रमुख बंडु सावंत, उपशहर प्रमुख नितीन सद्दिवाल, सुनिल भांबरे सह शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!