पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याचे बँक खाते सील; बातमी चूकीची असल्याचा संचालकांचा दावा.

बीड दि.16 जुलै – भाजप (BJP) नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे (Vaidyanath Sahakari Sugar Factory) बँक खाते सील करण्यात आले आहे आणि पीएफच्या (PFO) थकबाकीपोटी 92 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. ही कारवाई ईपीएफओ औरंगाबाद कार्यालयाने केली आहे. दरम्यान कारखान्याचे कोणतेही बँक खाते (Bank account) जप्त झालेले नसून यासंदर्भात येत असलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचा दावा कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. एस. दीक्षितूलू यांनी म्हटले आहे.

(Bank account of Vaidyanath Sahakari Sugar Factory sealed; The director claims that the news is wrong.)

भविष्य निर्वाह निधी थकबाकीदारांविरुद्धची या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचारी कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली नव्हती. कारखान्याच्या (पांगरी, परळी वैजनाथ, जिल्हा बीड) आस्थापनेची मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 काळासाठीची पीएफची 1 कोटी 46 लाख रुपये थकबाकी होती. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी सहायक आयुक्त आदित्य तलवा यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी एस. आर. वानखेडे यांनी ही कारवाई केली.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) चेअरमन असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून अडचणीत आहे. पगार न मिळाल्यामुळं कारखान्यातील 700 कामगारांनी मागील मार्च महिन्यात बंद पुकारला होता. मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही कर्मचाऱ्यांनी थकीत पगारासाठी अनेक दिवस आंदोलन केले होते. मात्र, त्यांना न्याय मिळत नव्हता. यातच पीएफच्या थकबाकीपोटी 92 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. औरंगाबाद ईपीएफओ कार्यालयाने ही कारवाई केली.

कारखान्याने मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 कालावधीतील पीएफचा भरणा केला नव्हता. पीएफपोटी (PFO) थकीत रक्कम 1 कोटी 46 लाख रुपये आहे. त्यामुळे थकीत रक्कम वसुली सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी वानखेडे यांनी वसुली नोंदवली. दरम्यान, सर्व भविष्य निधी थकबाकीदारांनी थकीत भविष्य निधी देयकांचा भरणा त्वरीत करावा, असे आवाहन क्षेत्रीय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे.

हा तर राजकीय खोडसाळपणा…
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कोणतेही बँक खाते जप्त झालेले नसून यासंदर्भात येत असलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचा दावा कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. एस. दीक्षितूलू यांनी म्हटले आहे.

दुष्काळ आणि अन्य आर्थिक कारणांमुळे वैद्यनाथ कारखाना सध्या आर्थिक अडचणीतून जात आहे. अशा कठीण परिस्थितीत अशा प्रकारच्या बातम्या देणं आणि शेतकऱ्यांचं भवितव्य धोक्यात आणणं हे एकूणच राजकीय खोडसाळपणाचे आहे. कारखान्याचे असे कोणतेही खाते सील झालेले नाही, असे दीक्षितूलू यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!