बापरे …. गंगा नदीतून आतापर्यंत 2 हजार मृतदेह काढले; केंद्रीय मंत्र्यांची माहिती.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दि.15 मे – गेल्या काही दिवसांपुर्वी बक्सर येथे गंगा नदी पात्रात अनेक मृतदेह वाहून आल्याचे निदर्शनास आल्यानंतर एकच खळबळ माजली होती. यानंतर गंगा नदीतून आतापर्यंत 2 हजारांच्यावर मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय मंत्र्यांनी दिली. हे मृतदेह उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील काही जिल्ह्यातून बाहेर काढण्यात आले आहेत.

(Bapare …. 2 thousand bodies have been removed from the river Ganga so far; Information of Union Ministers.)

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील बहुतांश मृतदेह (Dead Body) हे गंगा काठच्या दुर्गम गावातील कोरोना (Corona) रुग्णांचे आहेत. नदीपात्राच्या जवळील अनेक गावातील लोक गरीब आहेत. त्यांच्याकडे आपल्या कुटुंबियांवर अंत्यसंस्कार करण्याइतपतही पैसे नाहीत. त्यामुळे ते मृतदेह (Dead Body) नदीत फेकून देत आहेत. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहार (Bihar) या दोन्ही राज्यांना गंगा नदींचे 1400 किमी अंतरापर्यंत लांब खोरं लाभलेलं आहे.

केंद्रीय मंत्री उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहार (Bihar) सरकारच्या संपर्कात आहेत. त्यांनी गंगेतून वाहून आलेल्या मृतदेहांची त्वरित चाचणी करण्याच्या सुचना केल्या आहेत. या दोन राज्यात या मृतदेहांमुळे कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढू नये यासाठी करण्यात येत आहेत. मृतदेह नदीपात्रात फेकण्याच्या घटना या जास्तीकरून कानपूर, गाझीपूर, उन्नाव आणि बालिया या जिल्ह्यात घडल्या आहेत. हे मृतदेह पुढे वाहत बिहारपर्यंत पोहचले. या दोन्ही राज्यांना याबाबत त्वरित पावले उचलण्यास सांगितले आहे.

गंगा नदीत फेकलेल्या मृतदेहांचा शोध घेतला असता हे मृतदेह धार्मिक अंत्यविधी करुन नदीत फेकल्याचे निदर्शनास आले आहे. आता स्थानिक पोलिसांना नदी काठच्या गावात गस्त वाढवण्यास सांगण्यात आले आहे. याचबरोबर त्यांना गावाकऱ्यांमध्ये मृतदेह नदीत न फेकण्याबाबत प्रबोधन करण्याचेही आदेश त्यांना देण्यात आले आहेत. यापूर्वी, बिहारने हे मृतदेह उत्तर प्रदेशातील जिल्ह्यातून बिहारच्या हद्दीत वाहत येत असल्याचा आरोप केला होता.

आता या दोन्ही राज्यांनी नदी पात्रात स्वच्छ ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाय योजना सुरु केल्या आहेत. केंद्रीय गृहखात्याने दोन्ही राज्यांना हे प्रकरण थांबले नाही तर नदीचे पाणी दूषित होईल आणि मोठी आरोग्य समस्या निर्माण होईल असा इशारा दिला. केंद्रीय संस्थांनी ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याची चिंता व्यक्त केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणावर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!