कोरोंना विशेष

बीड आणि सोलापूरमुळे वाढली महाराष्ट्राची चिंता; देशात 22 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची चिंताजनक परिस्थिती.

मुंबई दि.29 जुलै – देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र निर्माण झाले असताना हळूहळू रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशातील 22 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची चिंताजनक परिस्थिती आहे. यात महाराष्ट्रातील बीड (Beed) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यांचा समावेश आहे. यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे.

(Beed and Solapur raised concerns in Maharashtra; Worrying situation of corona in 22 districts in the country.)

देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये (Corona Patient) पुन्हा वाढ होऊ लागली असून काही जिल्ह्यांची परिस्थिती पुन्हा धोकादायक बनली आहे. मणिपूर (Manipur) राज्यातील चंदेल जिल्ह्यात तर तब्बल 325 टक्क्यांनी कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. ही वाढ 28 जून ते 27 जुलै या एका महिन्यातील आहे. चंदेलमध्ये गेल्या चार आठवड्यांपैकी 28 जून ते 4 जुलै पर्यंतच्या पहिल्या आठवड्यात फक्त 8 रुग्ण सापडले होते. मात्र, ही संख्या वाढत गेली आणि 19 जुलै ते 25 जुलै दरम्यान तिथे 34 रुग्ण सापडले आहेत. रुग्णसंख्या जरी कमी असली तरी रुग्ण वेगाने वाढू लागल्याने सरकारची चिंता वाढली आहे.

देशातील रुग्ण संख्येत वाढ.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने अनेक राज्यांनी लॉकडाऊन (lockdown) आणि निर्बंध (restrictions) शिथिल केल्याने रुग्णसंख्येत पुन्हा वाढ दिसू लागली आहे. यात केरळ राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. नुकतेच जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अद्याप कोरोना गेलेला नाही, कोरोनाचे नियम पाळा असा सल्ला दिला. तर अनेक तज्ज्ञांनी लॉकडाऊनचे (lockdown) निर्बंध हटविणे धोक्याचे ठरू शकते असा इशारा दिला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Ministry of Health) माहितीनुसार देशातील 22 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची चिंताजनक परिस्थिती आहे. यात पूर्वोत्तर राज्यांपैकी मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि आसाममधील 13 जिल्हे तर उर्वरित पैकी केरळ 7 आणि 2 महाराष्ट्रातील जिल्हे आहेत. महाराष्ट्रातील बीड आणि सोलापूर हे दोन जिल्हे राज्याची चिंता वाढवत आहेत.

एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांच्या मतानूसार पूर्वोत्तर लोकांमध्ये कमी अँटीबॉडी विकसित झाली होती. यामुळे तिथे रुग्णसंख्येत वाढ दिसत आहे. आयसीएमआरने (ICMR) केलेल्या सिरो सर्व्हेमध्ये (Siro Survey) आसाममध्ये 50 टक्के सिरो प्रसार आहे. महाराष्ट्रातही (Maharashtra) कोरोना रुग्णांमध्ये बीड जिल्ह्यात 28 आणि सोलापूर जिल्ह्यांत 33 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!