कोरोंना विशेष

लॉकडाऊन काळातील कारवाया बाबत मोठी घोषणा….

मुंबई: दि.२१- कोरोना संकट काळात देशभर लॉकडाऊन (Lockdown) जाहिर करत संचारबंदी लावण्यात आली होती. या दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे राज्य सरकार नियमानुसार न्यायिक प्रक्रियेचे पालन करून मागे घेणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन (Lockdown) घोषित करण्यात आला होता. कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढू नये या हेतूने कठोर पावले उचलण्यात आली होती. सुरुवातीला घोषित करण्यात आलेली कडेकोट संचारबंदी हळूहळू वेगवेगळ्या टप्प्यात शिथिल करण्यात आली. मात्र, या काळात अनेकांनी नियमांचं उल्लंघन केलं. अनेकजण संचारबंदीच्या नियमांना धाब्यावर बसवून घराबाहेर पडले. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. त्यामुळे पोलीस (Police) प्रशासनाच्या कामावर मोठा ताण पडला होता. या विरोधात कठोर कारवाई पोलिसांनी (Police) केली होती. यातून अनेकांवर कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदरील कोरोना (Corona) काळातील गुन्हे राज्य सरकार मागे घेणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ट्विट करुन केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!