राज्य शासनाचा मोठा निर्णय…. शाळा सुरु होणार; मार्गदर्शक सुचना जारी.

मुंबई दि.5 जुलै – महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागानं (School education department) राज्यातील कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनानं याबाबत एक शासन निर्णय (Government decision) जारी केला आहे. कोरोनामुक्त (Corona free) क्षेत्रातील ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या ठरावांनी शासन निर्णयात जारी करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
(Big decision of state government …. school will start; Guidelines issued.)
मार्गदर्शक सूचना (Guidelines)
-ग्रामीण भागात कोविड मुक्त (Corona free) गावातील ग्रामपंचायतीनं त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील शाळेतील इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वी चे वर्ग सुरु करण्याबाबत पालकांशी चर्चा करुन ठराव करावा.
-शाळा सुरु (School start) करताना मुलांना टप्प्या टप्प्यात शाळेत बोलवण्यात यावं. म्हणजेच अदला बदलीच्या दिवशी, सकाळी आणि दुपारी महत्वाच्या विषयांना प्राधान्य देत शासनानं दिलेल्या कार्यपद्धतीचं पालन करण्यात यावं,
नियमांचं पालन करणं आवश्यक
-कोरोना संबंधी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी.
-शासनानं जारी केलेल्या कार्यपद्धतीचं काटेकोरपणानं पालन करावं.
-एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी,
-सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर,
-कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे,
-लगेच कोरोना चाचणी (Corona test) करुन घेणे या नियमांचं पालन करण्यात यावं,
संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी,
असं शासनाकडून शासन निर्णयात (Government decision) सांगण्यात आलं आहे.