मोठी बातमी …. शिवसेनेत आनंद ; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय.

नवी दिल्ली दि.23 अॉगस्ट – महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली असून कोर्टाने सदर प्रकरण 5 न्यायधिशांच्या घटनापिठाकडे वर्ग केले आहे. येत्या गुरुवारी 25 अॉगस्टला या संदर्भातील पहिली सुनावणी होणार आहे.
( Big news …. Anand in Shiv Sena ; Supreme Court’s big decision on Maharashtra power struggle.)
आज दि.23 मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी सुरु झाली. वारंवार तारीख पुढे जात असल्यानं सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेच्या (Shiv Sena) वकिलांनी हे प्रकरण मेन्शन केलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण पटलावर घ्यायला मान्यता दिली होती. दोन्हीही बाजू ऐकुन घेतल्यानंतर सुप्रिम कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. तसेच पुढील दोन दिवस चिन्ह व शिवसेनेसंदर्भात निवडणूक आयोगाला कोणताही निर्णय न घेण्याचा व विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचा मनाई आदेश दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण पटलावर घ्यायला मान्यता दिल्यानंतर शिवसेनेला दिलासा मिळाला होता. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होवून प्रकरण पाच न्यायमुर्तीच्या घटनापिठाकडे वर्ग करुन शिवसेनेच्या बाबतीत व चिन्हा बाबतीत पुढील दोन दिवस स्थगती मिळाली आहे. यामुळे आजचा निर्णय शिवसेनेला दिलासा मानला जात आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) स्थापन झालेल्या नवनिर्वाचित शिंदे (Eknath Shinde) -फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ स्थापन केलं असलं, तरी सत्तापेच मात्र अद्याप कायम आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित सदर प्रकरण घटनापिठाकडे वर्ग झाले आहे. येत्या 25 अॉगस्ट रोजी घटनापिठासमोर पहिली सुनावणी होणार आहे. या निर्णयानंतर शिवसेनेकडून आनंद व्यक्त केला जात असून न्यायालयावर संपुर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.