जनधन खात्यात आले पंधरा लाख; शेतकऱ्याने मानले प्रधानमंत्र्यांचे आभार… पुढे काय झाले पहा.

औरंगाबाद दि.8 फेब्रुवारी – औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पैठण तालुक्यात दावरवाडी येथील शेतकऱ्याच्या जनधन खात्यात सुमारे पंधरा लाख रुपये जमा झाले असून या पैशातून लाभार्थी शेतकऱ्याने टुमदार घर बांधले. जनधन खात्यात पैसे जमा झाले असल्याने लाभार्थ्यांने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेल करून आभार मानले.

(Listen yes listen … Jandhan account came to fifteen lakhs; The farmer thanked the Prime Minister … see what happened next.)

मात्र या शेतकऱ्याचा आनंद चार पाच महिने टिकला आहे. या शेतकऱ्याच्या जनधन खात्यावर जमा झालेले 15 लाख,34 हजार,624 रुपये हे पैठण तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायत विकासासाठी आलेल्या रक्कम चुकून या शेतकऱ्याच्या जन धन खात्यात जमा झाल्याचे निदर्शनास आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर जनार्दन औटे यांचे पैठण (Paithan) येथील बँक ऑफ बडोदा शाखेत खाते क्र. 41300100026456 असे आहे. त्यांच्या या खात्यात 17 अॉगस्ट 2021 रोजी 15 लाख,34 हजार, 624 रुपये जमा झाले. आपल्या खात्यावर इतकी मोठी रक्कम जमा झाल्याने या शेतकऱ्याने आठ दहा दिवस या रक्कम बाबत माहिती काढण्याचा प्रयत्न केला.

माहिती घेत असताना सदर शेतकऱ्यास लोकांनी सांगीतले की पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी जनधन खात्यावर पंधरा लाख रुपये टाकण्याची घोषणा केली होती. हे पंधरा लाख रुपये जनधन योजनेचे जमा झाले असतील अशी माहिती मिळाल्याने या शेतकऱ्याने खात्यातून 09 लाख 07 हजार रुपये काढले व ही रक्कम घर बांधकामासाठी वापरली.

सदरील रक्कम ही ग्राम पंचायत पिंपळवाडी ग्रामपंचायतच्या खात्यावर पडण्या ऐवजी तांत्रीक त्रुटी मुळे ज्ञानेश्वर जनार्दन औटे यांच्या खात्यात जमा झाली. धक्कादायक बाब म्हणजे सदरील रक्कम 17 अॉगस्ट 2021 रोजी औटे यांच्या खात्यात जमा झालेली असताना पाच महिन्यानंतर बडौदा बँकेच्या (State Bank of Baroda) अधिकाऱ्यांना जाग आली.

बँकेने ज्ञानेश्वर औटे यांना दि.22 डिसेंबर 2021 रोजी पत्र पाठवून चुकून जमा झालेली रक्कम परत करण्याबाबत पत्र पाठवले. या पत्रात सदरील बँकेच्या अधिकाऱ्यांनी उल्लेख केला आहे की दि. 17 अॉगस्ट 2021 रोजी आपल्या खात्यावर जमा झालेली रक्कम 15 लाख,34 हजार, 624 रुपये चुकून जमा झाले आहेत. सदरील रक्कम ही ग्रुप ग्रामपंचायत पिंपळवाडी यांना जमा करायला यायला हवी होती. परंतु काही तांत्रीक अडचणी मुळे ती रक्कम आपल्या खाते. क्रं. 41300100026456 वर जमा झालेली आहे. उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या आदेशानुसार सदरील रक्कम तुमच्या खात्या मध्ये लवकरात लवकर जमा करावी व शाखेला लवकर भेट द्यावी असे पत्राद्वारे कळविले.

या पत्राला ज्ञानेश्वर औटे यांनी उत्तर दिले की माझ्या जनधन (Jan Dhan) खात्यात जमा झालेली 15 लाख,34 हजार, 624 रुपयांची रक्कम पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी जमा केले असेल असा माझा समज झाला व याबाबत नागरिकांनी माहिती देताना हे पैसे जनधन योजनेचे जमा झाले असे सांगितल्याने मी ही रक्कम घर बांधकामासाठी वापरली आहे. सदरील रक्कमेची विल्हेवाट लावण्याचा माझा कुठलाही उद्देश नव्हता व नाही उर्वरीत 06 लाख 27 रुपये रक्कम आपण काढून घेतली आहे.

सदरील रक्कम ही पिंपळवाडी ग्रामपंचायत यांची जिल्हा परिषद औरंगाबाद (Aurangabad) यांनी पाठवलेले रक्कम होती ही बाब मला आपल्या पत्राद्वारे कळाली आहे. माझी सदर रक्कम भरण्याची इच्छा आहे परंतु आज रोजी मी सदर रक्कम भरू शकत नाही. मी माझ्या शेती उत्पादनातून मिळणाऱ्या रकमेतून सदर रक्कम आपल्या पत्रा प्रमाणे भरण्यास तयार आहे असे लेखी उत्तर ज्ञानेश्वर औटे यांनी बँकेला दिले आहे.

सदरील रक्कम ही चुकून ज्ञानेश्वर औटे यांच्या खात्यावर जमा झाली आहे हे जरी खरे असले तरी इतकी मोठी रक्कम दुसऱ्याच्या खात्यावर जमा झालेली असताना या बाबत चार महिने ग्रामपंचायतचे, जिल्हा परिषदचे अधिकारी हे गप्प का बसले यावरून त्यांचा भोंगळा कारभार उघडकीस आला आहे. या बाबत सविस्तर चौकशी होऊन यामध्ये दोषी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर तांगडे यांनी केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!