मित्राचे भांडण सोडवणे जीवावर बेतले; नवविवाहीत तरुणाच्या खुनाने खळबळ.

भोकरदन दि.6 अॉगस्ट – मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सागर भारत बदर )वय 27) या तरुणाचा खून (Murder) झाल्याची घटना 5 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता भोकरदन शहरात घडली. मयत सागरचा दिड महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सागरचा नाहक जीव गेला असून त्याच्या खुनामुळे खळबळ उडाली आहे. भोकरदन पोलिसात (Police) रात्री खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.

(Resolving a friend’s quarrel is life threatening; Excitement over the murder of a newlywed youth.)

या बाबतची सविस्तर माहिती अशी की, सागर भारत बदर (वय 27) रा. वालसा खालसा हा त्याचा मित्र कैलास फुके याचा लहान भाऊ सुनील फुके याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भोकरदन-जालना रोडवरील हॉटेल जयभवानी येथे आला होता. वाढदिवसाचा केक कापल्यानंतर कैलास गजानन फुके रा. फत्तेपुर याला योगेश पुंजाजी फुके याने फोन करत आपले जुने भांडण आहे ते मिटून घेऊन तू फत्तेपुर रोडवरील 132 केव्ही केंद्राजवळ ये म्हणून बोलावले.

यावेळी याठिकाणी योगेश सोबत हनुमंता फुके सुध्दा होता, कैलास फुकेने सागर बदरला दुचाकीवर सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचला. यावेळी कैलास व योगेश यांच्यात बाचाबाची झाली. मात्र मध्यस्थी करत सागर व इतरांनी भांडण सोडविले. कैलास दुचाकी चालविण्यासाठी बसला व त्याच्या मागे सागर बसण्याच्या तयारीत असतानाच योगेश फुके याने कमरेचा चाकू काढून सागर बदर याच्या पोटात खुपसला. तेव्हा सागर खाली कोसळला व योगेश पळून गेला. त्यानंतर कैलास व इतरांनी सागरला भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र रक्तस्त्राव जास्त झालेला असल्याने डॉक्टरांनी त्याला जालना (Jalna) येथे पाठविण्याचा निर्णय घेतला. मात्र जालना येथे पोहचण्यापूर्वीच रात्री 11 वाजेच्या दरम्यान सागरची प्राणज्योत मावळली. या प्रकरणात भोकरदन पोलिस ठाण्यात (Police station) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक (API) रत्नदीप जोगदंड करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!