भाजप म्हणतय उशिरा सुचलेलं शहाणपण; तर एमआयएम चे म्हणने हे तर दिवाळी गिफ्ट

मुंबई:  दि.१५- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेली राज्यातील मदिरं सुरु Temple Reopen करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Udhav Thakre यांनी यासंदर्भात काल माहिती दिली. यावर भाजपाकडून BJP सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याची तर मंदिरं खुली Temple Reopen करण्याच्या निर्णयावर धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय घेऊन सरकारने दिवाळी गिफ्ट दिलं आहे, अशी प्रतिक्रिया एमआयएम AIMIM खासदार इम्तियाज जलील Imtiyaz Jalil यांनी दिली.

मात्र मंदिर खुली झाली तरी कोरोना corona संदर्भातील खबरदारी म्हणजे मास्क, हँड सॅनिटायजर, सोशल डिस्टन्सिंग यांचं पालन करणे भाविकांना बंधनकारक असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Udhav Thakre यांच्या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत केलं आहे. यापूर्वी राज्यात धार्मिकस्थळ उघडण्यासाठी राजकीय पक्षाकडून रणाकंदन सुरु होतं. वंचित बहुजन आघाडीने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश केला होता. याशिवाय एमआयएमनेही AIMIM प्राथर्नास्थळं आणि मंदिर खुली करण्यासाठी आंदोलन पुकारलं होतं. अखेर आठ महिन्यांनी भाविकांसाठी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरं उघडी होत आहेत, त्यामुळे आता लोकांची जबाबदारी वाढली आहे. कोरोना corona संदर्भातले सर्व नियम भाविकांनी पाळले पाहिजेत. आपल्यामुळे परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाणार नाही यांची काळजी भाविकांनी घेतली पाहिजे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!