कोरोंना विशेष

सावधान…. आता औरंगाबाद पाठोपाठ मुंबई व ठाण्यात लॉकडाऊन…

मुंबई दि.9 मार्च – राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोके काढत आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा करोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. मुंबई (Mumbai) पाठोपाठ ठाणे शहरातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत जात आहे. ठाणे शहरातल्या काही भागात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातल्या काही भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं हॉटस्पॉट क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन (lockdown) घोषित करण्यात आला आहेत. यापूर्वीच औरंगाबाद (Aurangabad) येथे अंशतः लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी कालच मुंबईत अंशतः लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत.

(Caution …. Lockdown in Mumbai and Thane after Aurangabad …)

ठाणे महापालिकेनं परिपत्रक काढून लॉकडाऊन (lockdown) जाहीर केला आहे. ठाणे शहरात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ठाणे शहरातील काही भाग हॉटस्पॉट (Hotspot) म्हणून घोषित केलेत. यामुळेच ठाणे पालिका प्रशासनानं या भागातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी यासंदर्भातले आदेश काढले आहेत.

शहरातील १६ हॉटस्पॉट (Hotspot) असलेल्या भागांमधील कोरोनाची (corona virus) परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आजपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. हा लॉकडाऊन सुरूवातीच्या २१ दिवसांच्या लॉकडाऊन प्रमाणेच कडक असेल. हे लॉकडाऊन ३१ मार्चपर्यंत असेल, असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

या भागांमध्ये असेल ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन

आई नगर, कळवा, सूर्य नगर, विटावा
खारेगाव हेल्थ सेंटर, चेंदणी कोळीवाडा, वागळे, श्रीनगर, बाळकुम, लोढा माजीवाडा आणि लोढा आमारा, हिरानंदानी इस्टेट, हिरानंदानी मेडोज गृहसंकुले, लोकमान्य-सावरकरनगर, दोस्ती विहार, शिवाई नगर, कोरस टॉवर, कोलबाड आणि रुस्तुमजी, वृदांवन.

मुंबईत होणार अंशतः लॉकडाऊन- अस्लम शेख

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढीस लागल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर आर्थिक राजधानी असलेली मुंबई कोरोना विषाणूचा (corona virus) प्रमुख हॉटस्पॉट ठरली होती. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये शहरातील रुग्णसंख्या कमालीची घटल्याने दिलासादायक वातावरण निर्माण झाले होते. अशातच आता पुन्हा एकदा कोरोना ने डोके वर काढले असून शहरात गेल्या २४ तासांमध्ये १३६१ नवे रुग्ण आढळून आलेत. ही गेल्या १३१ दिवसांतील सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी शहरातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करताना शहरात कोरोनाचा उद्रेक आटोक्यात न आल्यास लवकरच मुंबईत ‘अंशत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल’ असे संकेत दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!