सावधान… जिल्ह्यात कडक ‘विकेंड लॉकडाऊन’; जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सुचना.

बीड दि.31 जुलै – मागील आठवडाभरात बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर कमी होण्याऐवजी वाढल्याने बीड जिल्ह्यात निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या आठवड्यात बीड जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 5 पेक्षा जास्त गेल्याने जिल्हा अजूनही तिसऱ्या लेव्हलमध्येच आहे. त्यामुळे सायंकाळ नंतरची संचारबंदी, शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊन (Weekend lockdown) आणि इतर निर्बंध (restrictions) कडक अमंलबजावणी करण्याच्या सुचना प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिल्या आहेत.
(Caution … Strict ‘weekend lockdown’ in the district; Instructions given by the Collector.)
राज्यात सरकारने अनलॉकसाठी पॉझिटिव्हिटी दर (Positivity rate) आणि ऑक्सिजन बेडचा वापर यावर आधारित 5 लेव्हल ठरवल्या आहेत. दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्यानंतर राज्य शासनाने निर्बंधात शिथिलता देण्याची भुमिका घेतली. दि.29 रोजी राज्य शासनाने महाराष्ट्रात 25 जिल्ह्यातील निर्बंध (restrictions) शिथिल करण्याचा निर्णय घेतला तर 11 जिल्ह्यात निर्बंध कायम ठेवले. यात मराठवाड्यातून केवळ बीडचा समावेश आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांची (Corona positive) संख्या वाढत आहे. पॉझिटीव्हीटी रेट (Positivity rate) 5 टक्क्यापेक्षा जास्त आहे. यामुळे राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात कडक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. दि.30 रोजी पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आढावा बैठक घेवून सर्व प्रशासकीय यंत्रणांना उपाययोजना अधिक कडक करण्याच्या सुचना केल्या. यात शेजारील कोरोना संसर्ग अधिक असलेल्या जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश आता अँटीजन चाचणी (Antigen test) बंधनकारक करण्यात आली आहे.
पालकमंत्री मुंडे यांच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी व्हिसीद्वारे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. याबैठकीत शनिवार व रविवारच्या विकेंड लॉकडाऊनसह (Weekend lockdown) कोविड-19 (Covid-19) च्या सर्व नियमांचे कडक अंमलबजावणी करण्याची सक्त निर्देश दिले आहेत. यावेळी प्रत्येक तालुक्यात स्वतः फेरफटका मारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याची अमलबजावणी शुक्रवारीच सुरु करण्यात आली असून 4 वाजल्यानंतर सुरु असणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात तहसीलदारांसह प्रमुख अधिकारी रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील चार तालुक्यात अधिच निर्बंध (restrictions) अधिक कडक करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी, जिल्हा कोविडमुक्त (Corona free) करण्यासाठी व संभाव्य तिसऱ्या लाटेची दक्षता घेण्यासाठी प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे.