सांस्कृतिक

दिवाळी सण साध्या पध्दतीने साजरा करा- जिल्हाधिकारी राहूल रेखावार

बीड,दि.१० :- (जि.मा.का) कोविड-19 Covid-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितचा विचार करता या वर्षीचा दिपावली Dipawali उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने या वर्षीचा दिपावली उत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे बाबत आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार Rahul Rekhawar यांनी केले आहे.

यासाठी खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना जनतेस देण्यात येत आहेत.
जिल्हयातील मोठ्या शहरांमध्ये व गांवामध्ये अद्यापही कोरोनाचे corona रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. चालू वर्षी कोविड covid या संसर्गजन्य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेवून गेल्या सात आठ महिण्यात आलेले सर्व धर्मीय सण, उत्सव अंत्यत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. या वर्षीचा दिपावली Dipawali उत्सव कोविड covid-19 कालावधीत साजरा केलेल्या अन्य उत्सवांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावा.

कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे साजरा केला जाणारा दिपावली Diwali उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षतां घेण्यात यावी. उत्सव कालावधीत नागरिकांनी गर्दी टाळावी व मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग, संक्रमण वाढणार नाही.

दिपावली Diwali हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवा दरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची अतिषबाजी करण्यात येते. यामुळे वायु व ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर परिणाम झालेल्या अनेकांना फटाकांच्या धुरामुळे वायु प्रदूषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भिती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे, त्याचा त्रास होऊ शकतो. त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करुन उत्सव साजरा करावा.

या उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम, कार्यक्रम उदा. दिपावली पहाट आयोजित करण्यात येऊ नयेत. आयोजित करावयाचे झाल्यास ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे त्याचे प्रसारण करावे.

सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना corona, मलेरिया, डेंग्यु इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी.

कोविड-19 covid-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगर पालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.
#Rahul Rekhawar

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!