संचारबंदीबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; तर अत्यावश्यक सेवाही होणार बंद.

मुंबई दि.15 एप्रिल – महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. या वाढत्या कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनुसार कडक निर्बंध राज्यभरात लागू करण्यात आले असून, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच घराबाहेर पडण्यास मुभा आहे. मात्र दिवसेंदिवस कोरोना वाढतोच आहे. त्यामुळं नागरिकांनी गर्दी केल्यास अत्यावश्यक सेवाही (Essential service) बंद कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांनी राज्यातील जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

(Chief Minister’s big decision regarding curfew; Even essential services will be shut down.)

गेल्या वेळी आपण कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यात बऱ्यापैकी यश मिळवले होते. मात्र, आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे. त्यामुळे कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे ही बैठक झाली. अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thakre) यांनी म्हटलं.

राज्य शासनानं दुर्बल घटकांसाठी जाहीर केलेले आर्थिक साहाय्य व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावे तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाही, यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. कोरोना विषाणूचे उत्परिवर्तन झालेले आपल्याकडील नमुन्यांमध्ये आढळले आहे. गेल्या वर्षीपेक्षा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, तरुण पिढी जास्त संक्रमित झाली आहे. प्राणवायू (Oxygen) उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. जिल्ह्यांच्या डॉक्टर्सनी बदललेल्या उपचार पद्धतींबाबत नेमकेपणाने काय करायचे ते राज्याच्या तज्ज्ञ कृती दलाकडून समजून घ्यावे.

अॉक्सिजनचा (Oxygen) उचित व योग्य वापर तसेच रेमडेसिविरसंदर्भात काळजीपूर्वक पावले उचलावी लागतील. तसेच आपण उभारलेल्या जम्बो सुविधा या येणारा पावसाळा, वादळे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत किंवा नाही ते तपासून घ्यावे. सर्व रुग्णालयांचे अग्निसुरक्षा परीक्षण त्वरेने पूर्ण करून घ्यावे, यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये. सूक्ष्म आणि लहान प्रतिबंधित क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे, असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटलं.

संचारबंदी (Curfew) काळात जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा (Essential service) सुविधा बंद केलेल्या नाहीत. मात्र याचा अर्थ संचारबंदी (Curfew) असताना तिथे नियम मोडले जात आहेत किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा, त्या सुविधा स्थानिक प्रशासनानं बंद कराव्यात, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. विवाह समारंभ हे कोरोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचं लक्षात आलं आहे, त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे जिल्हा व पोलीस प्रशासनाने पाहावे असे ठाकरे यांनी सांगितले.

आज संचारबंदीच्या पहिल्या दिवशी राज्यभरात व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसुन आले. मात्र मुंबई व पुण्यासह महाराष्ट्रात (Maharashtra) भाजी मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचे दिसुन आले. अनेक शहरात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरीक मोकाट फिरत असल्याचे दिसले. रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ बऱ्याच जिल्ह्यात दिसली. नियमांचे उल्लंघन होत असल्याचे अनेक ठिकाणी दिसुन आले. यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या विशेष अधिकारानुसार काही ठिकाणी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा किंवा ठराविक वेळा सुरु ठेवण्याचा निर्णय घेवू शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!