दिलासादायक; महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या घटली, मराठवाड्यातील या जिल्ह्यांचा समावेश.

मुंबई दि.4 मे – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना काहीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) 12 जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Infection) रोखण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊनची (lockdown) घोषणा केल्यानंतर गेल्या 15 दिवसांत ही रुग्णसंख्या घटल्याचं पाहायला मिळत आहे. यात मराठवाड्यातील (Marathwada) औरंगाबाद, नांदेड व लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.
(Comforting; The number of corona patients decreased in 12 districts of Maharashtra, including these districts in Marathwada.)
राज्यातील 12 जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे, त्यात औरंगाबाद, भंडारा, धुळे, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, नंदुरबार, ठाणे, वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात नागरिक, राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात (Maharashtra) या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. तसंच मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाल्याचं पाहायला मिळत होती. राज्य शासनाने महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन (lockdown) लागू केल्यानंतर परिस्थिती बदलत असल्याचे दिसत आहे. यामुळे आता या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत असल्याचं राज्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती ?
औरंगाबाद – 4 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान औरंगाबादेतील कोरोना प्रादुर्भाव (Corona Infection) वाढून रुग्णांची संख्या 10 हजार 505 झाली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान औरंगाबादेतील रुग्णसंख्या 6 हजार 748 पर्यंत खाली आली आहे.
भंडारा – 11 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान भंडाऱ्यात कोरोना रुग्णांची संख्या 9 हजार 550 वर पोहोचली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान रुग्णसंख्या 6 हजार 751 पर्यंत खाली आली आहे.
धुळे – 11 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान धुळ्यातील कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार 15 वर जाऊन पोहोचली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 373 पर्यंत आली आहे.
गोंदिया – 11 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान गोंदियातील कोरोना रुग्णांची संख्या 4 हजार 798 पर्यंत पोहोचली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार 295 पर्यंत खाली आली आहे.
जळगाव – 28 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान जळगावात कोरोना रुग्णांची संख्या 8 हजार 232 वर पोहोचली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान जळगावातील कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार 186 वर आली आहे.
लातूर – 11 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान लातूरमधील कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 566 पर्यंत पोहोचली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान ही संख्या 8 हजार 345 पर्यंत खाली आली आहे.
मुंबई – 4 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 58 हजार 598 पर्यंत पोहोचली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान ही संख्या 23 हजार 903 पर्यंत कमी झाली आहे.
मुंबई उपनगर – 4 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान मुंबई उपनगरातही कोरोना रुग्णांची संख्या 10 हजार 345 पर्यंत पोहोचली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान ही संख्या 6 हजार 520 पर्यंत कमी झाली आहे.
नांदेड – 11 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान नांदेडमधील कोरोना रुग्णांची संख्या 10 हजार 728 पर्यंत पोहोचली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान ही संख्या 5 हजार 577 पर्यंत कमी झाली आहे.
नंदुरबार – 11 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान नंदुरबारमधील कोरोना रुग्णांची संख्या 4 हजार 795 पर्यंत पोहोचली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान ही संख्या 1 हजार 256 पर्यंत कमी झाली आहे.
ठाणे – 4 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान ठाण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 हजार 877 पर्यंत पोहोचली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान ही संख्या 25 हजार 997 पर्यंत खाली आली आहे.
वाशिम – 11 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान वाशिममधील कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार 494 पर्यंत पोहोचली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान ही संख्या 2 हजार 736 पर्यंत कमी झाली आहे.