
किल्लेधारूर दि.३(वार्ताहर) शहरातील ४० जनांचे स्वॕब नमुने आज सकाळी लातूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आली असुन रात्री नऊ वाजेपर्यंत या स्वॕबचा अहवाल येणार आहे. दरम्यान येथून पाठवण्यात आलेल्या सर्वांची प्रकृती ठणठणीत असून त्यांच्यात कसलेही लक्षणे दिसून येत नसल्याचे डॉ. सचिन शेकडे यांनी सांगितले.
गेल्या सहा दिवसांपासून शहरात संचारबंदी लागू आहे. इंडियन मेडिकल कॉन्सिलच्या सुचनानुसार पाच दिवसानंतर बाधिताच्या जवळच्या संपर्कातील ४० जनांचे स्वॕब नमुने घेण्यात आली. अंबाजोगाई येथून १८ जनांचे तर केज येथून २२ जनांचे घेण्यात आलेले स्वॕब आज सकाळी लातूरच्या प्रयोगशाळेत पोहोचली. या नमुन्याचे अहवाल आज रात्री नऊपर्यंत उपलब्ध होतील. या ४० स्वॕबबद्दल आरोग्य विभागाशी विचारणा केली असता सदरील सर्वच व्यक्तीमध्ये कसलीही लक्षणे मिळून आलेली नाहीत. सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे. परंतु खबरदारी म्हणून आरोग्य विभागाच्या सुचनांचे पालन होत असून जनतेने घाबरुन जावू नये असे सांगण्यात आले.