पावसाचा हाहाकार…. दरड कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू; महाराष्ट्र हळहळला.

मुंबई दि.18 जुलै – मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये दरड कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसात आतापर्यंतची ही मोठी दुर्घटना आहे. बचावकार्यासाठी एनडिआरएफची (NDRF) तुकडी दाखल झाली आहे.

(Rainstorm …. 14 people died due to landslides; Maharashtra was shaken.)

मुंबई (Mumbai) आणि उपनगरांतील अनेक भागांत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. फोर्ट परिसर, कल्याण, भांडूप, अंधेरी, बोरिवली, कांदिवली या परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. ठाणे आणि रायगडमध्येही मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे (heavy rains) मुंबईतील हिंदमाता आणि अन्य सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

(आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी Beed24news च्या 9421944568 या क्रमांकाला आपल्या व्हॉटसॲप ग्रुपला ॲड करा)

मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या तुफान पावसामुळे अनेक परिसर जलमय झाले होतो. रात्रभर कोसळल्यानंतर सकाळच्या सुमारास पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानंतर काही भागांमधून पाणी ओसरायला सुरुवात झाली.

या पावसामुळे दहिसर नदीचं पाणी बोरीवली पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणावर साचलं होतं. ते देखील ओसरू लागलं आहे. अजूनही मुंबईच्या काही भागांमध्ये पाणी साचलेलं असून मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा रेल्वेच्या वाहतुकीवर पावसाचा परिणाम झाला आहे.

दरम्यान, चेंबूर परिसरात मध्यारात्रीनंतर दरड कोसळल्याने अकरा जण मृत्यूमुखी पडले आहेत. ही दरड खाली असलेल्या घरांवर कोसळल्याने ही दुर्घटना घडली. दरम्यान याची माहिती मिळताच एनडीआरएफच्या (NDRF) पथकाने तात्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. तर, येथे ढिगार्‍याखाली काही जण अजून अडकून पडले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!